शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक विकासदर ११ वर्षांतील नीचांकी मार्च अखेरची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 23:47 IST

विकासदर ३.१ टक्के

नवी दिल्ली : देश लॉकडाउनमधून जात असतानाच मार्च तिमाही अखेरची अर्थव्यवस्थेची आकडेवारी जाहीर झाली असून, या तिमाहीत देशाचा आर्थिक विकासदर ३.१ टक्क्यांवर आला आहे. देशाची गेल्या ११ वर्षांतील ही नीचांकी वाढ आहे.

भारत सरकारच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वरील स्थिती आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.२ टक्के राहिला असून, गेल्या ११ वर्षातील ही सर्वात कमी अशी कामगिरी आहे. देशात कोरोनाचा उद्रेक झाल्याने २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वच आर्थिक उलाढाली ठप्प झाल्या असून, त्याचा परिणाम येत्या २ तिमाहीमध्ये दिसून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विविध पतमापन संस्थांनी भारतीय आर्थिक वाढ कमी राहण्याचा अंदाज या आधीच व्यक्त केलेला आहे.

कमी झालेल्या विकासदरामुळे अर्थसंकल्पीय तूट वाढत असते. सन २०१९-२० या वर्षात ही तूट जीडीपीच्या ४.५९ टक्के एवढी वाढली आहे. अर्थसंकल्पात ती ३.८ टक्के राहण्याचा अंदाज अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला होता.

एप्रिल महिन्यात ८ क्षेत्रांची ३८ टक्के घसरण

देशातील ८ प्रमुख उद्योग क्षेत्रांमध्ये एप्रिल महिन्यात ३८.१ टक्क्यांनी घट झाल्याची आकडेवारी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे जवळपास सर्वच औद्योगिक उत्पादन बंद होते. त्याचा फटका या उद्योगांना बसला आहे. कोळसा, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम उत्पादने, पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये एप्रिल महिन्यातील घट ही २ अंकी राहिली आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात या ८ पायाभूत क्षेत्रांमध्ये ५.२ टक्के एवढी वाढ झाली होती. मार्च महिन्यात मात्र या पायाभूत क्षेत्रांमध्ये ९ टक्के आकुंचन झाले होते.

सेवा क्षेत्राला लॉकडाऊनमुळे मोठा फटका : सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत उत्पादन क्षेत्रात १.४ टक्के, तर बांधकाम क्षेत्रात २.२ टक्के घट झाल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. देशाच्या एकूण उत्पादनात ५५ टक्के वाटा असलेल्या सेवा क्षेत्राला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला असून, त्यामुळे नोकऱ्याही गमवाव्या लागल्या आहेत.

जीएसटी कौन्सिलची बैठक पुढील महिन्यात

च्देशातील जीएसटीबाबत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या जीएसटी कौन्सिलची बैठक पुढील महिन्यात होणार आहे. लॉकडाऊनमुळे देशातील करमहसूल कमी झाला असला तरी कमी गरजेच्या वस्तूंवर जीएसटी वाढविण्यास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची तयारी नसल्याचे अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. या आधी जीएसटी कौन्सिलची बैठक मार्च महिन्यात झाली होती.

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्था