शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:40 IST

एसी (AC) ब्लास्ट किंवा शॉर्ट सर्किट हे आगीचं कारण मानलं जात आहे. मात्र या दुर्घटनेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे 'स्मार्ट डोअर लॉक'चं अपयश.

दिल्लीतील विवेक विहार येथे घडलेल्या आगीच्या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे की, आपली घरं खरोखर सुरक्षित आहेत का? एका निवासी इमारतीला सकाळी आग लागली आणि बघता बघता ९ निष्पाप जीवांचा बळी गेला. प्राथमिक तपासात एसी (AC) ब्लास्ट किंवा शॉर्ट सर्किट हे आगीचं कारण मानलं जात आहे. मात्र या दुर्घटनेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे 'स्मार्ट डोअर लॉक'चं अपयश.

काय आहे स्मार्ट डोअर लॉक?

आजकाल बाजारपेठेत स्मार्ट डोअर लॉक्सची मोठी विक्री होत आहे. पारंपारिक कुलूपांच्या जागी हे लॉक लावलं जातं. ई-कॉमर्स वेबसाइट्सपासून दुकानांपर्यंत ते सहज उपलब्ध आहेत. हे लॉक ॲपद्वारे, कार्डद्वारे किंवा पिन कोड सेट करून उघडता येतात. काही स्मार्ट लॉक फिंगरप्रिंटवर चालतात, तर काही ओटीपी (OTP) द्वारे उघडतात. सुरक्षेसाठी यात अनेक फीचर्स दिले जातात, परंतु भारतात उपलब्ध असलेले अनेक स्मार्ट लॉक्स आग लागल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत निकामी होतात.

आग लागली, तिथे इलेक्ट्रॉनिक स्मार्ट डोअर लॉक 

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मजल्यावर आग लागली तिथे इलेक्ट्रॉनिक स्मार्ट डोअर लॉक सिस्टमने काम करणं बंद केलं होतं. जसा वीजपुरवठा खंडित झाला आणि आग पसरली, तसे दरवाजे जाम झाले. लोक आत अडकले आणि बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले. काही लोक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत राहिले, पण सिस्टम प्रतिसाद देत नव्हती. यामुळे अनेक लोक धूर आणि आगीत अडकले. हा अपघात केवळ शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग नव्हती, तर अनेक छोट्या चुकांचा एकत्रित परिणाम होता.

इमारतीच्या खिडक्यांना लोखंडी ग्रील्स बसवण्यात आले होते, ज्यामुळे लोकांना बाहेर पडता आले नाही. छताचा दरवाजाही बंद होता, जो आपत्कालीन मार्ग (Emergency Exit) ठरू शकला असता. संपूर्ण इमारतीत येण्या-जाण्यासाठी एकच मार्ग होता. जेव्हा आग पसरली, तेव्हा धूर वेगाने वर गेला आणि लोकांकडे वाचण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उरला नाही.

स्मार्ट डोअर लॉक किती सुरक्षित?

आता प्रश्न असा निर्माण होत आहे की, स्मार्ट डोअर लॉकसारखं तंत्रज्ञान अशा परिस्थितीत धोकादायक ठरू शकतं का? शहरांमध्ये स्मार्ट लॉक्सची लोकप्रियता वाढत आहे. विनाकिल्ली दरवाजा उघडणं, मोबाईलवरून नियंत्रण मिळवणं किंवा फिंगरप्रिंटने प्रवेश करणं या सुविधा लोकांना आकर्षित करतात. चोरांपासून संरक्षण करण्यासाठीही हे सुरक्षित मानले जातात.

आगीसारख्या आणीबाणीच्या प्रसंगी चित्र बदलतं. बहुतेक स्मार्ट लॉक वीज किंवा बॅटरीवर चालतात. जर शॉर्टसर्किट झालं, सिस्टम हँग झाली किंवा बॅटरी संपली, तर दरवाजा उघडणं कठीण होतं. काही लॉक्समध्ये 'मॅन्युअल ओव्हरराइड' (हाताने उघडण्याची सोय) असते, पण अनेकदा घाबरलेले लोक त्याचा वापर करू शकत नाहीत किंवा ते नीट काम करत नाही.

तज्ज्ञांचे मत काय?

अग्निशमन तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही घरात किंवा इमारतीत तंत्रज्ञानासोबतच मूलभूत सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नये. जर दरवाजा इलेक्ट्रॉनिक असेल, तर त्यात मॅन्युअल लॉकचा पर्याय असणे अनिवार्य आहे. आपत्कालीन स्थितीत वीज नसतानाही दरवाजा उघडता आला पाहिजे. याशिवाय घरात एकापेक्षा जास्त बाहेर पडण्याचे मार्ग असणं आवश्यक आहे.

जर तुमच्या घरात स्मार्ट लॉक असेल, तर त्यात मॅन्युअल चावीचा पर्याय आहे का, हे नक्की तपासा. वीज गेल्यावर तो उघडतो का? घरातून बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग आहे का? खिडक्यांतून बाहेर पडता येईल का? हे छोटे प्रश्नच मोठ्या संकटातून वाचवू शकतात.

दिल्लीच्या या घटनेने हे सिद्ध केलं आहे की, केवळ स्मार्ट लॉकच नाही तर इमारतीचे नियोजनही महत्त्वाचं असतं. जर खिडक्यांना ग्रील्स असतील, रस्ता बंद असेल आणि पायऱ्यांचा एकच मार्ग असेल, तर आगीच्या वेळी परिस्थिती अत्यंत भयानक होते. धूर हा सर्वात मोठा धोका असतो जो काही मिनिटांत माणसाला बेशुद्ध करू शकतो. गेल्या काही वर्षांत एसी ब्लास्ट आणि इलेक्ट्रिकल आगीच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळ्यात लोड वाढल्यामुळे वायरिंग गरम होऊन धोका वाढतो. अशा वेळी घरात अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं असल्यास जोखीम अधिक वाढते.

English
हिंदी सारांश
Web Title : Smart Home or Death Trap? Faulty Locks Trap Nine in Fire

Web Summary : Delhi fire exposes smart lock dangers. Faulty locks trapped residents, causing nine deaths. Experts warn against relying solely on electronic systems. Emergency exits and manual overrides are crucial for safety.
टॅग्स :delhiदिल्लीfireआगDeathमृत्यूtechnologyतंत्रज्ञान