शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इराणमधील चाबहार बंदर प्रकल्प चर्चेतून गायब..; काँग्रेसची मोदी सरकारच्या धोरणांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 15:19 IST

Congress on Iran Crisis: इराणमधील चाबहार बंदर भारतासाठी का महत्त्वाचा आहे? जाणून घ्या...

Congress on Iran Crisis: इराणमधील चाबहार बंदर प्रकल्पाबाबत काँग्रेसने केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या प्रकल्पासाठी 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणताही निधी ठेवण्यात आला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, प्रकल्पाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच या निर्णयाचा भारताच्या मध्य आशियातील कूटनीतीवर परिणाम होऊ शकतो, असेही म्हटले.

मनमोहन सरकारच्या काळात प्रकल्पाला गती

जयराम रमेश यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले की, चाबहार बंदर प्रकल्पाची संकल्पना 1990 च्या दशकाच्या अखेरीस भारत-अफगाणिस्तान-इराण सहकार्य धोरणा अंतर्गत पुढे आली होती. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाला महत्त्वपूर्ण गती मिळाली. मे 2013 मध्ये केंद्र सरकारने चाबहार बंदरात प्रारंभी 115 मिलियन डॉलर्स गुंतवणुकीला मंजुरी दिली होती. त्या काळात भारत-अमेरिका नागरी अणुकरार लागू करण्याच्या दिशेनेही मोठी पावले उचलत होता, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

मोदी सरकारने प्रकल्प रीपॅकेज केला

जयराम रमेश यांनी आरोप केला की, ऑक्टोबर 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने मनमोहन सिंग यांच्या पुढाकाराला “रीपॅकेज” करून तो पंतप्रधानांच्या नव्या दृष्टिकोनाचा भाग असल्याप्रमाणे सादर केला. 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात चाबहार प्रकल्पासाठी कोणताही निधी ठेवण्यात आलेला नाही, त्यामुळे भारत या प्रकल्पातून बाहेर पडला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मध्य आशिया कूटनीतीसाठी धक्का?

शासनात सातत्य असणे ही मूलभूत बाब आहे. मात्र, सध्याचे सरकार पूर्वीच्या सरकारच्या उपक्रमांना मान्यता देण्याऐवजी त्यांना नव्या स्वरूपात सादर करते. या प्रकल्पासाठी निधी नसल्याचा अर्थ भारत या प्रकल्पातून बाहेर पडला आहे का, की भारताने आपली गुंतवणुकीची जबाबदारी पूर्ण केली आहे? पाकिस्तानातील ग्वादर बंदर (जे चीनने विकसित केले आहे) याच्या सुमारे 170 किमी पश्चिमेस असलेले चाबहार बंदर आता चर्चेतून गायब होत आहे. यामुळे भारताच्या मध्य आशिया धोरणाला दुसरा मोठा धक्का बसू शकतो. यापूर्वी भारताने ताजिकिस्तानमधील दुशांबे जवळ असलेला अयनी हवाई तळ बंद केल्याचेही जयराम रमेश यांनी नमूद केले.

भारतासाठी का महत्त्वाचा आहे चाबहार बंदर ?

इराणच्या दक्षिण-पूर्व भागात असलेला चाबहार बंदर प्रकल्प भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या प्रकल्पामुळे भारताला अरबी समुद्रमार्गे इराण, अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील देशांपर्यंत थेट व्यापार मार्ग उपलब्ध होतो. विशेषतः उझबेकिस्तान, कझाकिस्तान यांसारख्या देशांपर्यंत कमी अंतराचा आणि अधिक विश्वासार्ह व्यापार मार्ग तयार करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chabahar Port Project in Iran Fades; Congress Criticizes Modi Government

Web Summary : Congress questions the future of Iran's Chabahar port as funding disappears. Jairam Ramesh highlights the lack of budgetary allocation for the project, potentially impacting India's Central Asia diplomacy. He recalls the project's progress under Manmohan Singh, while Modi's government repackaged it.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरFuel Crisisइंधन टंचाईNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस