शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले? काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 09:51 IST

Bihar Election 2025: मतदारांचा हा प्रचंड उत्साह राज्यातील राजकीय पक्षांसाठी, विशेषतः सत्ताधारी 'एनडीए'साठी, चिंतेचा विषय ठरत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदारांनी सर्व विक्रम मोडून काढले आहेत. १८ जिल्ह्यांमधील १२१ विधानसभा मतदारसंघांमध्ये विक्रमी ६४.६९ टक्के मतदान झाले आहे, जे मागील निवडणुकीपेक्षा तब्बल ८.५ टक्क्यांनी अधिक आहे. मतदारांचा हा प्रचंड उत्साह राज्यातील राजकीय पक्षांसाठी, विशेषतः सत्ताधारी 'एनडीए'साठी, चिंतेचा विषय ठरत आहे.

बिहारच्या निवडणूक इतिहासातील आकडेवारीनुसार, राज्यात जेव्हा जेव्हा मतदानाच्या टक्क्यात ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तेव्हा तेव्हा सत्तापरिवर्तन झाले आहे. वाढलेले मतदान हे सामान्यतः 'सत्ताविरोधी लाट' (Anti-incumbency) दर्शवते आणि जनतेला राजकीय बदल हवा आहे, असे मानले जाते. १९६७, १९८० आणि १९९० च्या निवडणुकीत ५ टक्क्यांहून अधिक मतदान वाढल्याने सत्ताधारी पक्षाला पायउतार व्हावे लागले होते.

२०२० च्या निवडणुकीत या १२१ जागांवर 'महाआघाडी'ने ६१ जागा जिंकल्या होत्या, तर 'एनडीए'ला ५९ जागा मिळाल्या होत्या. यंदा 'एनडीए'मध्ये चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाहा यांचा समावेश झाला आहे, तर मुकेश सहनी 'महाआघाडी'सोबत आहेत, ज्यामुळे जुनी समीकरणे बदलली आहेत.

पहिल्या टप्प्यात मतदानात झालेली ही ८.५ टक्क्यांची वाढ विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील 'एनडीए' सरकारसाठी धोक्याची घंटा ठरते की, 'महाआघाडी'साठी ही वाढ अनुकूल ठरते, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदान वाढीमुळे दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला दोन्ही बाजूंकडून मोठी ताकद लावली जाणार आहे. 

अनेक ठिकाणी मतदारांना रोखले...बिहारमध्ये राजदची मतपेढी असलेल्या भागात अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाचा वापर करून मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखले जात असल्याचे आरोप केले जात आहेत. याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar's Increased Voter Turnout: A Signal of Government Change?

Web Summary : Bihar's record voter turnout, 8.5% higher, sparks concerns for the NDA government. Historically, surges above 5% indicate anti-incumbency. With shifting alliances and allegations of voter suppression, all eyes are on whether this boost favors the Mahagathbandhan or signals trouble for Nitish Kumar.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलJanta Dal Unitedजनता दल युनायटेड