शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर दाटले ढग; शहरात हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:38 IST

नाशिक : आठ-दहा दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस होऊ शकलेला नाही. घाटमाथ्यावरील इगतपुरी वगळता जिल्ह्याला अद्यापही पावसाने हुलकावणी दिलेली आहे.

ठळक मुद्देइगतपुरीत धोधो : पेठ, त्र्यंबकेश्वरला पावसाच्या सरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आठ-दहा दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस होऊ शकलेला नाही. घाटमाथ्यावरील इगतपुरी वगळता जिल्ह्याला अद्यापही पावसाने हुलकावणी दिलेली आहे.
आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने धरणांमधून विसर्ग करावा लागल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहिले. जिल्ह्यातील धरणे तृप्त झाल्यामुळे पाण्याचादेखील प्रश्न मिटला. त्यानंतर श्रावणातील पाऊस वगळता पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरूच आहे. मुंबईतील पावसानंतर नाशिकमधील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस मात्र सुरूच आहे. इगतपुरीत बुधवारी ५४ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाचा तालुका असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये १२ तर पेठमध्ये १४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. बुधवारी जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी केवळ ७.५ टक्के नोंद झाली आहे.
सर्वाधिक पाऊस हा इगतपुरीमध्ये नोंदविण्यात आला. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरीत पावसाचा जोर कायम आहे. यंदा पेठवर पावसाची कृपादृष्टी चांगलीच बरसली आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही चांगला पाऊस झाला. या महिन्यात म्हणजेच १ सप्टेबरपासून ११ तारखेपर्यंत इगतपुरीत ४९४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तर पेठमध्ये २८५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दहा दिवसांत त्र्यंबकेश्वरमध्ये १९९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरण समूहात होणाऱ्या पावसामुळे धरणांचा पाणीसाठा वाढत आहे. बुधवारी (दि.११) गंगापूर व आळंदी धरणात १००, तर कश्यपीमध्ये ९९ आणि गौतमी गोदावरीत ९८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे धरणातून गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने विसर्ग सुरू आहे.जल्ह्यातील प्रकल्पांमधील पाण्यासाठी ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये सध्या ९४ टक्के इतका पाणीसाठा आहे. मागीलवर्षी जिल्ह्यातील पाणीसाठ्याची टक्केवारी अवघी ८० टक्के इतकी होती. त्यामुळे पाणी नियोजन आणि पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागली होती. यंदा मात्र समाधानकारक पाऊस आहे. पावसाची टक्केवारीनाशिक ३.२, इगतपुरी ५४.०, दिंडोरी ४.०, पेठ १४.०, त्र्यंबकेश्वर १२.०, मालेगाव शून्य, नांदगाव शून्य, चांदवड २.०, कळवण २.०, सुरगाणा १०.१, देवळा शून्य, निफाड ६.०, सिन्नर ४.०, येवला शून्य याप्रमाणे पावसाची टक्केवारी राहिली.