शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ‘कुरिअर्स’चा पोस्टाला ताप

By admin | Updated: January 31, 2016 22:00 IST

खासगी ‘कुरिअर्स’चा पोस्टाला ताप

किशोर इंदोरकर मालेगाव कॅम्पसध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा सुरू असून, टपाल खात्यातील सेवेला खासगी कुरिअर्स सेवाचा फटका बसत आहे. कुरिअर्स सेवेला सामोरे जाऊन टपाल खात्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. दररोज सरासरी पाच हजारांहून अधिक पत्रांचे वाटप टपाल खात्यातून होत असल्याने खासगी सेवेचे आव्हान पोस्टासमोर आहे.शहर परिसराचा व्याप मोठा आहे. मालेगावची लोकसंख्या दहा लाखांवर पोहचली आहे. वाढलेला परिसर, वस्त्यांचे जाळे यामुळे टपाल खात्यास प्रत्येकाचे पत्र संबंधितांपर्यंत पोहचवणे आव्हान आहे. खासगी कुरिअर्स सेवेला नागरिकांनी पसंती दिली आहे. शहरात टपाल खात्याच्या मुख्य कार्यालयासह नवापूर वॉर्ड, शहर टपाल खाते (रॉयल गल्लीमधील) संगमेश्वर, मार्केट यार्ड कार्यालयातील पोस्टमास्तर यांच्यासह कॅम्प टपाल कार्यालयातील सहा कर्मचारी असे एकूण २७ पोस्टमास्तर टपाल पत्रे वितरण करण्याची कामे करीत आहेत.विविध राज्ये, जिल्हे व गावांतून दररोज साडेपाच ते सहा हजार पत्रे मालेगावी वाटपासाठी येतात. ही पत्रे कर्मचारी रोज किरकोळ अपवाद वळगता शहरातील संबंधितांच्या पत्त्यांवर वेळेत पोहचवतात. या पत्रांमध्ये टपाल खाते कार्यालय विशेषत: सरकारी पत्रे, विमा कंपनी, दूरध्वनी बिले, दैनिक, साप्ताहिके, मासिक, वृत्तपत्र, लग्नपत्रिका आदिंचा मोठ्या प्रमाणात भरणा असतो. पोस्ट कार्ड व आंतरदेशीय पत्रही किरकोळ प्रमाणात येतात. सध्या आॅनलाइन खरेदी मालाचे वितरण काही प्रमाणात पोस्ट खात्यातून होत आहे, तर टपाल कार्यालयात स्पीड पोस्ट, नोंदणी पत्रव्यवहार (रजिस्ट्रेशन), पार्सल सेवासह इतर आर्थिक गुंतवणूक सेवा सुरू असल्याने कार्यालयात गर्दी दिसून येते. या उलट शहरात खासगी टपाल सेवा देणारे कुरिअर्सची सात ते आठ केंद्र आहेत. त्यांच्यामार्फत शहरात विविध ठिकाणी ८०० ते ९०० पत्रे, टपालांचे वितरण होते. त्यामुळे टपाल खात्यावर नागरिकांची विश्वासार्हता टिकून असल्याचे दिसते. परंतु टपाल खात्यापेक्षा जादा जलद सेवा देत असल्याचा दावा कुरिअरवाले करतात. देशभरातील महत्त्वाच्या व मोठ्या शहरात ४८ ते ७२ तासात टपाल व इतर पार्सल पोहचवण्याचे काम कुरिअर्सवाले करतात. त्यामुळे काही प्रमाणात नागरिक या सेवेकडे आकर्षित झाले आहेत. टपाल खात्यापेक्षा कुरिअर सेवा महागडी आहे. येथील पत्र, टपाल पोहच करण्यासाठी अगदी २० रुपयांपासून पुढे टपालनुसार पैसे मोजावे लागतात, तर टपाल कार्यालयात अगदी पाच रुपयांच्या तिकिटांवर पत्र देशभरात कुठेही पोहचू शकते; कुरिअर केंद्रात पोस्ट खात्याप्रमाणे इतर व्यवहारांच्या सुविधा नाही. त्यामुळे टपाल खात्याचे महत्त्व आजही टिकून असल्याचे येथील कर्मचारी सांगतात.