शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट रोडच्या तक्रारीला तब्बल दीड वर्षानंतर पीएमओचे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST

नाशिक : सरकारी काम, सहा महिने थांब, असे म्हटले जाते. मात्र, केंद्र सरकारच्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ...

नाशिक : सरकारी काम, सहा महिने थांब, असे म्हटले जाते. मात्र, केंद्र सरकारच्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील डिजिटल इंडिया म्हणजे वेगाने कामकाज करणाऱ्या सरकारी यंत्रणेचा नाशिकचे पारस लोहाडे यांना भलताच अनुभव आला आहे. मोदी यांच्या संकल्पनेतील स्मार्ट सिटी करताना नाशिकचा अत्यंत गाजलेल्या स्मार्ट रोडचे काम दीड वर्षापासून रखडले आहे अशी तक्रार करणाऱ्या लोहाडे यांना पंतप्रधानांच्या तक्रार निवारण कक्षाने आणखी दीड वर्षाने उत्तर पाठवले आहे. त्यात काम संपले, स्मार्ट रोड सुरू झाल्याने तक्रार बंद इतकेच माफक कळविले आहे.

म्हणजेच अर्धवट रस्त्याची तक्रार केल्यानंतर ते पूर्ण होऊ दिल्यानंतर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने वेळ घेतला असेल तर अजब तुझे सरकार म्हणण्याचीच वेळ आली आहे, अशी भावना तक्रारकर्त्या लोहाडे यांनी व्यक्त केली आहे.

स्मार्ट सिटी हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून नाशिक शहराचा त्यात चार वर्षांपूर्वी समावेश झाला. या प्रकल्पाअंतर्गत त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान अवघ्या १ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी तब्बल १७ कोटी रुपये खर्च आला. त्यातही रस्त्याचे काम तब्बल तीन वर्षे चालले. जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय आणि अन्य शासकीय कार्यालये, शाळा आणि बाजारपेठा असलेल्या या मार्गाचे काम रखडल्याने सर्वांचेच हाल झाले. सामाजिक कार्यकर्ते पारस लोहाडे यांचे अशोकस्तंभ येथे दुकान असून त्यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाल्याने त्यांनी त्रस्त होऊन अखेरीच पंतप्रधानांच्या तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार केली होती. कामाच्या संथगतीमुळे चार वेळा मुदतवाढ दिलेल्या या मार्गाचे काम पूर्ण होत नसल्याने अखेरीस आपण पंतप्रधान म्हणून लक्ष घालावे अशी तक्रार त्यांनी केली होती. १ जुलै २०१९ रोजी त्यांनी पंतप्रधानांच्या पोर्टलवर ही तक्रार त्यांनी केली. त्यानंतर त्याचे काहीच उत्तर आले नाही. गेल्या वर्षी या रस्त्याचे काम पूर्ण झाले. दरम्यान, या ठेकेदाराला कंपनीने प्रति दिन ३६ हजार रुपये दंड केला. तो नंतर बंद केला. या दंडाला ठेकेदार कंपनीने लवाद नियुक्त करून आव्हानदेखील दिले. त्यानंतर आता गुरुवारी (दि.२८) पंतप्रधान कार्यालयाने प्रत्युत्तर पाठवले असून आता रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग तुमच्यासाठी खुला झाला आहे. एवढे उत्तर देऊन तक्रार निकाली काढली आहे. त्यामुळे लाेहाडे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

कोट...

मोदी सरकारने मला वाढदिवसाच्या दिवशी प्रत्युत्तर देऊन अनोखी भेट दिली आहे. किमान उत्तर देताना रस्त्याचे काम कसे काय पूर्ण झाले आणि कंपनीने ठेकेदारावर कारवाई केली हे तरी नमूद करायला हवे होते. रस्ता सुरू झाला हे दिल्लीहून पंतप्रधान कार्यालयाने कळवण्याची गरज नव्हती. डिजिटल इंडियाचा कारभार इतका वेगाने होत असेल तर काँग्रेसच्या काळातील कागदावरील व्यवहार काय वाईट होता?

- पारस लोहाडे, तक्रारकर्ते, नाशिक

...

स्मार्ट रोडचा संग्रहीत फोटो वापरावा.