शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा दरात उसळी, उत्पादकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 01:49 IST

नाशिक : लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांची प्राप्तिकर विभागाने तपासणी केल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले होते. सोमवारी (दि. १९) लिलावाची प्रक्रिया नियमित सुरू झाल्यानंतर कांदा दराने विक्रमी उसळी घेत लासलगावी ६ हजार ८९१ रुपये तर पिंपळगाव बसवंत येथे ७ हजार ९७१ रूपये इतका दर मिळाला. जिल्ह्यातील अभोणा येथील उपकेंद्रावर सर्वाधिक ८ हजार ८०० रूपये दर मिळाला. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा लाभला आहे.

ठळक मुद्देउच्चांक : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ८ हजार ८०० रूपये दर

नाशिक : लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांची प्राप्तिकर विभागाने तपासणी केल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले होते. सोमवारी (दि. १९) लिलावाची प्रक्रिया नियमित सुरू झाल्यानंतर कांदा दराने विक्रमी उसळी घेत लासलगावी ६ हजार ८९१ रुपये तर पिंपळगाव बसवंत येथे ७ हजार ९७१ रूपये इतका दर मिळाला. जिल्ह्यातील अभोणा येथील उपकेंद्रावर सर्वाधिक ८ हजार ८०० रूपये दर मिळाला. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा लाभला आहे.लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत २ हजार ९१ रूपये प्रति क्विंटल मागे जास्त इतका उच्चांकी या हंगामातील बाजारभाव मिळाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नवीन लाल कांद्याला ११ हजार १११ रुपये इतका उच्चांकी ऐतिहासिक बाजारभाव लासलगाव बाजार समितीत मिळाला होता. उन्हाळ कांद्यालाही चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकºयांनी उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. त्यामुळे १३० टक्के इतके उत्पादन निघाले होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशासह विदेशातही लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे कांद्याला मागणी घटली. परिणामी, कांद्याचा उत्पादन खर्चर्ही निघणे मुश्कील झाले होते. त्यानंतर यंदाच्या पावसाळी हंगामात पावसाचा जास्त दिवस राहिलेला मुक्काम आणि परतीच्या पावसाने चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला तर शेतात नवीन लाल कांद्याच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले. मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांद्याचे बाजार भावात दररोज वाढ होत आहे. सोमवारी या दराने उच्चांक गाठला. अभोणा केंद्रावर ८ हजार ८०० रूपये, वणी केंद्रावर ८ हजार ७०१ तर कळवण केंद्रावर ८ हजार ५०५ रुपये दर मिळाला.वाढते कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून आधी निर्यातबंदी त्यानंतर कांद्याच्या व्यापाºयांवर प्राप्तिकर विभागाची छापेमारी करण्यात आली. आता कांदा आयात करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र अनेक महिने अत्यंत कवडीमोल भावाने विक्री झालेल्या कांद्याला आज जरी चांगला मिळत असेल तरी अजूनही शेतकºयांचे नुकसान भरून निघाले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा आयात करू नये अन्यथा राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांना फिरकू दिले जाणार नाही.- भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

 

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड