शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने द्राक्ष उत्पादक चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:35 IST

निफाड तालुक्यात शुक्रवारपासून आलेले ढगाळ वातावरण अन् शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

निफाड : तालुक्यात शुक्रवारपासून आलेले ढगाळ वातावरण अन् शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.निफाड तालुक्यात गेल्या १५ दिवसांत पावसाने उघडीप दिल्याने शेतीची कामे वेगाने सुरू असतानाच शुक्रवारपासून पुन्हा वातावरण बदलले आहे. शनिवारी रात्री जोरदार तर रविवारी दिवसभर संततधार पाऊस झाला. यामुळे द्राक्षबागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. फुलोºयात असलेल्या द्राक्षबागांना बुरशीजन्य रोगांचा धोका वाढला आहे. अजून दोन दिवस पाऊस अन् ढगाळ हवामान कायम राहणार असल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.निफाड तालुक्यातील उगाव, शिरवाडे, वनसगाव, शिवडी, खेडे, सोनेवाडी, सारोळे, दावचवाडी, खडकमाळेगाव, सावरगाव, रानवड, नांदुर्डी, नैताळे, शिवरे आदी भागात द्राक्षबागांच्या गोड्याबार छाटण्या वेगाने सुरू आहे. अनेक द्राक्षबागा कोवळा फुटवा पोंगा अवस्थेत आहेत तर लवकर छाटणी झालेल्या बागा फुलोरा अवस्थेत आहेत. द्राक्षबागांच्या मशागतीची कामे गतीने सुरू आहेत त्यातच गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान अन् द्राक्ष उत्पादक गावात कोसळलेल्या पावसामुळे द्राक्षबागांवर बुरशीजन्य डावणी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्याचबरोबर नवीन फुटव्यातील द्राक्षघड जिरणेचे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर नवीन निघालेला द्राक्ष घडाची गोळी होण्याचे संकटही द्राक्ष उत्पादकांसमोर उभे आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी औषधांची फवारणी करण्याचा खर्च वाढत आहे. नियमित कराव्या लागणाºया रोगप्रतिकारक औषधांच्या फवारणीपेक्षा अधिक फवारणी करावी लागत आहे. एका ऐवजी तीन तीन फवारणी होत असल्याने खर्च वाढला आहे.सोयाबीन सोंगणीला आले आहे. त्याचा पाला खराब होतोय, ज्यांनी सोयाबीन सोंगणी करून शेतात ठेवली आहे ती सोयाबीन खराब होण्याचा धोका वाढला आहे. सध्या भाव चांगले असल्याने टमाटा उत्पादक शेतकरी खुश होते पण पाऊस सुरू झाल्याने पाला खराब होऊन टमाटा खराब होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर होईल. लाल कांदाही काही ठिकाणी काढणीला आला आहे, त्यावरही परिणाम होऊन उत्पादन घटेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी दिवसभर संततधार पाऊस पडत असल्याने निफाड तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसagricultureशेती