शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटी फेक अकाउंट डिलिट; तरीही रेल्वे तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्यांचा सुळसुळाट

By नरेश डोंगरे | Updated: May 4, 2026 20:09 IST

Nagpur : भारतीय रेल्वेच्या रिझर्व्हेशन काऊंटरवर ऑनलाइन आणि ऑफलाइन कब्जा मारणाऱ्या दलालांकडून रेल्वे प्रवाशांची बिनबोभाट लूट केली जात आहे.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रेल्वेच्या रिझर्व्हेशन काऊंटरवर ऑनलाइन आणि ऑफलाइन कब्जा मारणाऱ्या दलालांकडून रेल्वे प्रवाशांची बिनबोभाट लूट केली जात आहे. या लुटमारीकडे रेल्वे प्रशासन आणि कारवाईचा अधिकार असणाऱ्या यंत्रणांनी 'साळसुदपणे दुर्लक्ष' केल्यामुळे यंत्रणांची ही बेफिकरी आहे की, दलालांसोबत त्यांची मिलीभगत, असा प्रश्न चर्चेला आला आहे.

रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी ऑनलाइनचा वापर करताच 'जाम'चा अनुभव अपवाद वगळता प्रत्येकच प्रवाशाला नियमित येतो. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या गैरप्रकाराकडे रेल्वे बोर्डाने गेल्या वर्षी नजर फिरवली. दलालांचे रॅकेट ही लुटमार करीत असल्याचे लक्षात येताच भारतीय रेल्वेने देशभरातील सुमारे ३ कोटी फेक अकाउंट्स ब्लॉक करून आयआरसीटीसीच्या प्लॅटफॉर्मवरून हटवले. दलालांवर अंकुश ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यावेळी सांगितले होते. शिवाय तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी-आधारित व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात आले. तसेच, थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मसाठी तत्काळ बुकिंग विंडो ३० मिनिटांनंतरच उघडण्यात येईल, असा नियम करण्यात आला. या सर्व प्रकारानंतर गरजू प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणे सुलभ होणार असल्याचे दावे रेल्वेकडून केले जात होते. मात्र, ते फोल ठरले. अजूनही प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळणे दुरापास्त आहे. दलालांकडे जादा पैसे दिल्यास हमखास आरक्षित तिकीट मिळते. अर्थात, रेल्वेच्या तिकीट काऊंटरऐवजी दलालांकडे गेल्यास तिकीट मिळत असल्याने दलालांचा रेल्वेतील प्रभाव आणि सुळसुळाट अधोरेखित होत आहे.

५० पेक्षा जास्त दलाल सक्रिय

दलालांकडून रेल्वेची ई-तिकिटे काढण्यासाठी पर्सनल युजर आयडीचा गैरवापर केला जातो. एकच दलाल त्याच्या, नातेवाईक आणि मित्रांच्या पर्सनल युजर आयडीवरून तिकिटे काढतो. या अवैध व्यवहाराची रक्कम जमा करण्यासाठीही नातेवाइकांच्या बँक खात्याचा वापर केला जातो. महाराष्ट्रात हा गोरखधंदा सर्वत्र बिनबोभाट सुरू आहे. एकट्या नागपुरात अशाच प्रकारे ५० पेक्षा जास्त दलाल सक्रिय आहेत.

कारवाईचा नुसताच फार्स

दलालांचा सुळसुळाट सर्वत्र असताना, अधूनमधून एखादी कारवाई होताना दिसते. गेल्या वर्षी बुलडाणा जिल्ह्यात ई-तिकिटांच्या काळाबाजारीचे रॅकेट चालविणारे टोळके रेल्वे प्रशासनाने पकडले. या रॅकेटचे मुंबईच्या दलालांशी लागेबांधे असल्याचेही त्यावेळी उघड झाले. मात्र, नंतर त्यात काय झाले, ते स्पष्ट होऊ शकले नाही. गेल्या चार महिन्यांत फक्त दोन दलाल (एप्रिलमध्ये) पकडण्याच्या कारवाया नागपुरात झाल्या. कारवाईनंतर अनेक वेळा दलालांची नावे उजेडात येणार नाही, याची खास काळजी घेतली जाते. त्याचमुळे यंत्रणेतील मंडळींची दलालांसोबत अभद्र युती असल्याचा संशय घेतला जात आहे.

अधिकारी म्हणतात...

या संबंधाने अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता गाड्यांमधील गर्दी वाढल्याने रिझर्व्हेशन मिळत नाही, असे सांगून दलालांची माहिती मिळाल्यास आमच्याकडून तत्काळ कारवाई केली जाते, असे अधिकारी म्हणतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Accounts Deleted, Yet Railway Ticket Black Market Thrives

Web Summary : Despite deleting fake accounts, railway ticket black marketing persists, allegedly fueled by official negligence or collusion. Over 50 active brokers in Nagpur exploit loopholes, while occasional raids yield little impact, raising suspicions of complicity within the system.
टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर