शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बालभारतीकडून साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 17:37 IST

२०१२ सालापासून बालभारतीने(Balbharti) साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत विकली. रद्दीत काढलेल्या पुस्तकांचे एकूण वजन ५ हजार ६३३ मेट्रिक टन इतके होते, तर यापासून ६ कोटी ४० लाख २ हजार ६० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकीकडे दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत शालेय पुस्तके पोहोचत नसल्याचे चित्र असताना, बालभारतीला मात्र हजारो टन पुस्तकांची विल्हेवाट लावावी लागत आहे. २०१२ सालापासून बालभारतीने(Balbharti) साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत विकली. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत बालभारतीकडे विचारणा केली होती. २०१२ सालापासून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळाने किती पुस्तके रद्दीत काढली, त्यापासून किती महसूल मिळाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार एप्रिल २०१२ पासून ते मार्च २०१९ या कालावधीत चार वेळा पुस्तके रद्दीत काढली. रद्दीत काढलेल्या पुस्तकांचे एकूण वजन ५ हजार ६३३ मेट्रिक टन इतके होते, तर यापासून ६ कोटी ४० लाख २ हजार ६० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. २०१२-१३, २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ या साली पुस्तके रद्दीत काढण्यात आली. २०१६-१७ मध्ये सर्वाधिक २ हजार ९८ मेट्रिक टन पुस्तके रद्दीत विकण्यात आली. 

पूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ

कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत बालभारतीला रद्दीत पुस्तके काढण्यात आल्याची कारणे, उंदीर व वाळवीमुळे खराब झालेली पुस्तके, गोदामातील एकूण पुस्तके यांचीदेखील माहिती विचारली होती. ही सर्व माहिती एकाच विषयाशी संबंधित होती. परंतु बालभारतीच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी हे सर्व विषय वेगवेगळ्या मुद्द्यांशी निगडित असल्याचे कारण देत, माहिती देण्याचे टाळले. या माहितीसाठी स्वतंत्र अर्ज करण्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Educationशिक्षण