शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील शेतकऱ्यांविरुद्धचा कोलकातामधील खटला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST

नागपूर : कर्ज थकवल्यामुळे एल ॲण्ड टी फायनान्स कंपनीने गडचिरोली जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांविरुद्ध कोलकाता येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल ...

नागपूर : कर्ज थकवल्यामुळे एल ॲण्ड टी फायनान्स कंपनीने गडचिरोली जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांविरुद्ध कोलकाता येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी शेतकऱ्यांना सदर दिलासा दिला.

भजन मलकाम व पतीराम हिचामी अशी शेतकऱ्यांची नावे असून ते आरमोरी येथील रहिवासी आहेत. एल ॲण्ड टी फायनान्स कंपनीने त्यांना ६ लाख १२ हजार रुपयांचे कर्ज दिले होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी या कंपनीकडे एक वाहन गहाण ठेवले होते. शेतकऱ्यांनी कर्जाचे काही हप्ते दिल्यानंतर उर्वरित रक्कम थकवली. त्यामुळे कंपनीने ७ फेब्रुवारी २०१८ रोजी या शेतकऱ्यांविरुद्ध कोलकाता येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये त्या न्यायालयाने २६ मार्च २०१८ रोजी दोन्ही शेतकऱ्यांना समन्स बजावला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा खटला रद्द करण्याची विनंती केली. ती विनंती मान्य करण्यात आली.

कंपनीने वादग्रस्त खटला दाखल करण्यापूर्वी कर्जाचे प्रकरण लवादासमक्ष ठेवले होते. २३ जानेवारी २०१७ रोजी लवादाने कंपनीच्या बाजूने ६ लाख ६२ हजार ६६४ रुपयांचा अवॉर्ड जारी केला. तसेच, गहाण वाहन ताब्यात घेऊन त्याची विक्री करण्याची कंपनीला परवानगी दिली. असे असताना कंपनीने महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली व त्या न्यायालयापासून लवादाचा अवॉर्ड लपवून ठेवला. त्यावरून कंपनी शुद्ध हेतूने वागली नाही हे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. कंपनीने लवादाच्या अवॉर्डची माहिती लपवून ठेवली नसती तर, महानगर दंडाधिकारी न्यायालयाने कंपनीची तक्रार खारीज केली असली असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. याशिवाय उच्च न्यायालयाच्या कंपनीच्या तक्रारीत काहीच गुणवत्ता आढळून आली नाही. परिणामी, वादग्रस्त खटला रद्द करण्यात आला.

--------------

अधिकारक्षेत्राचा आक्षेप खोडून काढला

शेतकऱ्यांनी कोलकाता येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयातील तक्रारीविरुद्ध याचिका दाखल केली असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ ही याचिका ऐकू शकत नाही, असा आक्षेप एल ॲण्ड टी फायनान्स कंपनीने घेतला होता. उच्च न्यायालयाने तो आक्षेप खोडून काढला. शेतकरी गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांना गडचिरोली येथे कर्ज वितरित करण्यात आले. तसेच, शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेल्या वाहनाची गडचिरोली येथे नोंदणी झाली आहे. त्यामुळे या उच्च न्यायालयाला ही याचिका ऐकण्याचा अधिकार आहे, असे कंपनीला सांगण्यात आले.