शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहर पोलिसात ‘किंग’ होते इनामदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 01:33 IST

राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी उपराजधानीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. १९९१ ते ९३ दरम्यान त्यांनी पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यावेळी पोलीस आयुक्तांना सांकेतिक भाषेत ‘किंग’ असे संबोधले जात होते.

ठळक मुद्देउपायुक्त, आयुक्त म्हणून पार पाडली जबाबदारी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी उपराजधानीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. अतिशय न्यायप्रिय व कर्तव्यदक्ष असलेल्या इनामदार यांनी पोलीस उपायुक्त, पोलीस आयुक्त म्हणून नागपूर शहराची कमान सांभाळली होती. इनामदार यांचे मुंबई येथे निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून महाराष्ट्र पोलिसात त्यांची ख्याती राहिली आहे.मुंबईकर असलेले इनामदार यांचे नागपूरशी सौख्य राहिले आहे. त्यांचे अनेक मित्र नागपुरात आहे. मित्रांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी नागपुरात त्यांची ये-जा राहत होती. येथे आल्यानंतरही ते आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी आतिशय आत्मियतेने भेटत होते. इनामदार यांची १९७५ मध्ये उपायुक्त म्हणून नेमणूक झाली. १९९१ ते ९३ दरम्यान त्यांनी पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यावेळी पोलीस आयुक्तांना सांकेतिक भाषेत ‘किंग’ असे संबोधले जात होते. पोलीस आयुक्तांचे पद महानिरीक्षकाच्या समकक्ष असते. त्यांच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अवस्था विस्फोटक झाली होती. स्वत: इनामदार यातून वाचले होते. पोलिसांना ही स्थिती निपटण्यासाठी फायरिंग करावे लागले. यात नऊ लोकांचा जीव गेला. त्यामुळे तत्कालीन सरकारसुद्धा दबावात आले होते. इनामदार यावेळी कारवाईची पर्वा न करता आपल्या भूमिकेवर ठाम होते.इनामदार यांच्या कार्यकाळात मेंटेनन्स ऑफ इंटरनल सेक्युरिटी अ‍ॅक्ट (मिसा) दहशत होती. इनामदार यांनी या कायद्याचा भरपूर वापर केला. त्यांच्या काळात ३६ आरोपी व अवैध धंद्यात गुंतलेल्यांविरुद्ध मिसा अन्वये कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरातील आरोपींनी पळ काढला होता. इनामदार फाऊंडेशनच्या माध्यमातून पोलीस विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आयुक्त असतानाही पायी सवारीइनामदार हे व्यायामाला महत्त्व देत होते. बहुतांश त्यांच्या मुंबई-दिल्ली वाऱ्या असायच्या. बरेचदा ते सोनेगाव विमानतळावर उतरल्यानंतर आपल्या सरकारी निवासस्थानापर्यंत पायीच जायचे. तत्कालीन पोलीस अधिकाºयांनी त्यांना बरेचदा सामान्य व्यक्तीप्रमाणे पायीच घरी जाताना बघितले. ३५ वर्षात २९ ट्रान्सफरइनामदार आपल्या भूमिकेशी कधीही समझोता करीत नव्हते. याच कारणामुळे त्यांच्या ३५ वर्षातील सेवेत २९ वेळा ट्रान्सफर झाली. जळगाव सेक्स स्कॅण्डलच्या चौकशीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ते जेव्हा पोलीस महासंचालक होते, तेव्हा सत्ता परिवर्तन झाले होते. राजकीय नेत्यांशी मतभेदामुळे त्यांनी स्वेच्छिक सेवानिवृत्ती घेतली होती.

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तDeathमृत्यू