शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मदतीच्या ‘लाईव्ह’ प्रकारांवर बंदी घाला

By admin | Updated: December 16, 2015 03:11 IST

राज्यातील शेतकरी संकटात आहे. परंतु काही लोकप्रतिनिधींकडून त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने स्वत:चे ‘मार्केटिंग’ करण्यात येते व प्रसारमाध्यमांच्या समोर शेतकऱ्यांना मदत करण्यात येते.

नागपूर : राज्यातील शेतकरी संकटात आहे. परंतु काही लोकप्रतिनिधींकडून त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने स्वत:चे ‘मार्केटिंग’ करण्यात येते व प्रसारमाध्यमांच्या समोर शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. बळीराजाला मदत अवश्य झाली पाहिजे, परंतु त्याचा दिखावा करणे अयोग्य आहे. राज्य शासनाने शेतकरी मदतीच्या अशा ‘लाईव्ह’ प्रकारांवर बंदी आणली पाहिजे अशी मागणी सत्तापक्ष तसेच विरोधी पक्षातर्फे सादर झालेल्या २६० अंतर्गतच्या दुष्काळाच्या चर्चेच्या प्रस्तावांवर सोमवारची चर्चा मंगळवारी सकाळी पुढे सुरू झाली. दुष्काळादरम्यान मराठवाड्यात माझे सातत्याने काम सुरू आहे. राज्य शासनातर्फे घोषित ‘पॅकेज’पैकी सर्वात कमी वाटा मराठवाड्याच्या वाट्याला आलेला आहे. शासकीय योजनांना हवी तशी गती मिळत नाही व याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. जलसंधारणाची कामे खोळंबली आहेत. जल लवादने मंजूर केलेले पाणी मराठवाड्याला मिळालेलेच नाही. दुष्काळाच्या प्रश्नात राजकारण दूर सारून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवे असे मत, जयंत पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी दुष्काळाच्या मुद्यावर शासनाला चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांमध्ये शासनाबाबत विश्वासार्हताच उरलेली नाही. मराठवाड्यावर तर केंद्र व राज्य शासन मिळून अन्याय करीत आहे. विदर्भातील जिल्हा सहकारी बँकांना ४१० कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. विदर्भातील अनेक बँकांना थेट पंतप्रधान कार्यालयातर्फे मदत करण्यात आली आहे. सौरऊर्जा पंपांच्या वाटपातदेखील मराठवाड्यावर अन्याय झाला आहे. पाच लाखांपैकी मराठवाड्याच्या वाट्याला अवघे ९०० सौरऊर्जा पंप आले, असा आरोप त्यांनी केला. राज्यातील सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना ‘सीएसआर’ अनिवार्य आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाचा पुढाकार आवश्यक असल्याची सूचनादेखील त्यांनी केली. भाजपाच्या शोभा फडणवीस यांनी शासनाचे १ वर्ष व आघाडी शासनाची १५ वर्षे यांची तुलनाच केली. सत्तेवर आल्यापासून युती शासनाने शेतकऱ्यांना ५ हजार २५७ कोटी रुपयांची मदत केली आहे. तर दुष्काळासंदर्भात यंदा ४ हजार कोटींचा प्रस्तावदेखील केंद्राकडे पाठविला आहे, असा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांचे समुपदेशनदेखील आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, सभागृहाच्या नियोजित कार्यक्रमानुसार मंगळवारी ही चर्चा सव्वा दोन तास चालली. वेळेअभावी आता ही चर्चा बुधवारी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)