शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपासाठी ५०० कोटी

By admin | Updated: March 9, 2015 01:53 IST

सोमवारपासून सुरू होत असलेले राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय

कमल शर्मा ल्ल नागपूरसोमवारपासून सुरू होत असलेले राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विदर्भासाठी चांगले दिवस आणू शकते. कमीत कमी विदर्भातील कृषी पंपांचा अनुशेष दूर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे तरी हे संकेत मिळत आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानुसार राज्य सरकार कृषी पंपाचा बॅकलॉग दूर करण्यासाठी ५०० कोटी रुपये वितरित करणार आहे. बॅकलॉग तातडीने संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात एकूण ९६० कोटी रुपयांचा कृषी पंपाचा अनुशेष आहे. त्यापैकी ६० टक्के अनुशेष एकट्या विदर्भात आहे. विदर्भवादी याला विदर्भावरील अन्याय मानतात. ज्या गतीने हे काम सुरू आहे, ते पाहता अनुशेष संपविण्यासाठी आणखी १०० वर्षे लागतील, असा आरोप सुद्धा केला जात आहे. डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने कृषी पंपाचा अनुशेष हा विदर्भाच्या मागासलेपणाचे मुख्य कारण असल्याचे मान्य केले आहे. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात मागणीपेक्षा अधिक तीन लाख पंप लावण्यात आले आहेत तर दुसरीकडे विदर्भ व मराठवाड्यामध्ये पाच लाख कृषी पंपांचा अनुशेष कायम आहे. राज्याच्या नव्या सरकारने अनुशेषाची समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी ५०० कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी महावितरण नागपूर परिमंडळातील अधिकाऱ्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करतांना यासंबंधीचे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये कृषी पंपाच्या अनुशेष निर्मूलनासाठी ५०० कोटी रुपये आणि पुढच्या वर्षी ४६० कोटी रुपये दिले जातील. कृषी पंपाची मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कनेक्शन देण्याचे आदेश सुद्धा ऊर्जामंत्र्यांनी दिले. लोकमतशी बोलतांना बावनकुळे यांनी अनुशेष निर्मूलनासाठी शासन कटिबद्ध आहे आणि त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)विद्युत खांब हटविण्याचा भार आता नागरिकांवर नाही ४प्लॉट किंवा शेतातून विजेचे खांब हटविण्याचा भार आतापर्यंत सामान्य नागरिकांवर पडत होता. परंतु भविष्यात हे काम जिल्हा नियोजन समितीला मिळणाऱ्या विकास निधीतून केला जाईल, असे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. जर निधी कमी पडेल तर महावितरण खर्च उचलेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.