शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात रेल्वेचे ११ अपघात टळले; सतर्क कर्मचाऱ्यांचा सत्कार

By नरेश डोंगरे | Updated: February 11, 2025 19:07 IST

Nagpur : तर मालगाडी घसरली असती

नरेश डोंगरे - नागपूर                                                                                                                                      

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : यावर्षीच्या पहिल्याच महिन्यात अर्थात जानेवारी २०२५ मध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी रेल्वेचे तब्बल ११ अपघात टळले. ऑन रूट सतर्कतेने कर्तव्य बजावणाऱ्या ठिकठिकाणच्या कर्मचाऱ्यांमुळे रेल्वेचे हे संभाव्य अपघात टाळण्यास मदत मिळाली. टळलेल्या या अपघातात नागपूर नजीकच्या बोरखेडीजवळच्याही एका प्रकाराचा समावेश आहे. 

देशात अलिकडे रेल्वे अपघात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे अधिकारी कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहे. छोट्याशा चुकीमुळे किंवा दुर्लक्षितपणामुळे रेल्वे अपघात होतो. त्यामुळे प्रत्येकाने रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम करण्याच्या सूचना वजा आदेश देण्यात आले आहे. सतर्कपणे काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रात वेळोवेळी विशेष पुरस्कार देऊन सन्मानितही केले जाते. आज अशाच कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सतर्क कर्मचाऱ्यांचा सत्कार

महाराष्ट्रात मध्य रेल्वेचे मुंबई पुणे, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ असे चार विभाग (डिव्हीजन) आहेत. जानेवारी महिन्यात मुंबई विभागात रेल्वेचे तीन संभाव्य अपघात टळले. पुणे विभागात चार, सोलापूर २ आणि नागपूर तसेच भुसावळ विभागात प्रत्येकी १ रेल्वेचा अपघात टळला. हे अपघात टाळणाऱ्या ११ ही सतर्क रेल्वे कर्मचाऱ्यांना ११ फेब्रुवारीला मुंबई रेल्वे महाव्यवस्थापक धर्मवीर मिना यांच्या हस्ते 'महाव्यवस्थापक सुरक्षा' हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

... तर मालगाडी घसरली असती१९ जानेवारीला नागपूर नजिकच्या बोरखेडी रेल्वे स्थानकावर अविनाश कुमार नामक पॉईंटसमन कर्तव्यावर होते. एक मालगाडी धावत असताना त्यांना गाडीच्या चवथ्या क्रमांकाच्या वॅगनच्या फ्रंट ट्रॉलीचा व्हील प्लॉज पुर्णत: वर आल्याचे दिसले. तशा अवस्थेत आणखी काही वेळ मालगाडी धावली असती तर ती रुळावरून घसरून मोठा अपघात झाला असता. ते ध्यानात येताच अविनाश कुमार यांनी लगेच ट्रेन मॅनेजर आणि स्टेशन मास्टरला माहिती दिली. त्यामुळे मालगाडी तात्काळ थांबवून दुरूस्ती करण्यात आली. अविनाश कुमार यांच्या सतर्कतेमुळे हा संभाव्य अपघात टळल्याने त्यांना महाव्यवस्थापक मिना यांच्या हस्ते आज मंगळवारी मुंबईत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

टॅग्स :nagpurनागपूर