शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
9
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
10
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
11
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
12
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
13
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
14
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
15
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
16
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
17
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
18
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
19
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
20
​मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'जॉन अब्राहम' म्हणून करत, अमित ठाकरेंची व्हीआयपी संस्कृतीवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

लग्न केलं तेच चुकलं, असं कुणाला वाटतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 12:18 IST

Relationship News: प्रेसिया नावाच्या एका जपानी मॅचमेकिंग कंपनीचा जानेवारी २०२६ मधील हा सर्व्हे आहे. या कंपनीने देशातील २० ते ५९ या वयोगटांतील २८७ विवाहित महिलांना प्रश्न विचारला. तुम्हाला तुमच्या पतीशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होतो आहे का?, यावर ७० टक्के महिलांनी हो, असे उत्तर दिले. तसे हे उत्तर अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होते,

- चंद्रकांत कित्तुरे
(वृत्तसंपादक, कोल्हापूर)

'तुझ्याशी लग्न केलं तेच चुकलं, पश्चात्ताप होतोय आता याचा. अनेकजण सांगत होते करू नको, पण म्हटलं नाही हाच माझ्या आयुष्याचा जोडीदार, आवडला होतास तू मला. तुझं वागणं, बोलणं, राहणं, दिसणं सगळं कसं सतत हवहवसं वाटायचं, पण लग्नानंतर तुझे खरे रूप दिसू लागलं. अन् हाच का मला आवडलेला तू? असा प्रश्न पडू लागला. पण, नाही आता हे असह्य झालंय, आपण वेगळं झालेलंच बरं', अशा शब्दांत बायको नवऱ्याला सुनावत होती अन् नवरोबा चुपचाप ऐकत होते. या दोघांचा प्रेमविवाह होता अन् लग्नाचे नऊ दिवस संपताच त्यांच्यात खटके उडू लागले होते.

हा संवाद आठवण्याचे कारण म्हणजे जपानमध्ये नुकताच झालेला एक सर्व्हे. प्रेसिया नावाच्या एका जपानी मॅचमेकिंग कंपनीचा जानेवारी २०२६ मधील हा सर्व्हे आहे. या कंपनीने देशातील २० ते ५९ या वयोगटांतील २८७ विवाहित महिलांना प्रश्न विचारला. तुम्हाला तुमच्या पतीशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होतो आहे का?, यावर ७० टक्के महिलांनी हो, असे उत्तर दिले. तसे हे उत्तर अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होते, कारण १० पैकी सात महिला त्यांच्या वैवाहिक जीवनात सुखी नव्हत्या. नवऱ्याची कमाई, त्याच्या सवयी, दोघेही नोकरी करत असल्याने नवऱ्यानेही संसारात समानच नाही तर काहीवेळा जास्तीचा हातभार लावावा, असे वाटणे, किरकोळ गोष्टींवरून चीडचीड, संशय घेणे, लग्नाआधी सुखी संसाराची जी स्वप्ने पाहिली होती, ती प्रत्यक्षात न येणे, अशी अनेक कारणे यामागे होती.

कुटुंबव्यवस्थेसाठी चिंताजनक स्थिती
१२ कोटी लोकसंख्या असलेल्या जपानमधील ९३ टक्के लोकसंख्या शहरी आहे. शिवाय केवळ २८७ महिलांच्या सर्व्हेवरून संपूर्ण देशातील विवाहित महिलांबाबत असाच निष्कर्ष काढणे कदाचित चुकीचे ठरेल. पण औद्योगिकदृष्ट्या प्रगत जपानमधील महिलांचे भावविश्व उदासीनतेकडे तरी चाललेले नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. हा प्रश्न कुटुंबव्यवस्थेसाठी चिंताजनक आहे, हे निश्चित.

भारतात असा सर्व्हे होईल?
१. एकदा लग्न झाले की, तोच आयुष्याचा जोडीदार. तो कसाही असला तरी त्याच्याशी जमवून घेत आयुष्य काढायचे, अशा विचारांचा पगडा असलेल्या भारत देशातील विवाहित महिला त्यांच्या संसारात सुखी आहेत का?, असा विचारही कधी कुणी केला नसेल. त्यामुळे जपानसारखा सर्व्हे अद्याप तरी भारतात झालेला नाही.

२. भारतातील ६५ ते ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. भारतीय समाजात पतीला परमेश्वर मानले जाते. पती, सासरच्या मंडळींकडून सुख मिळो न मिळो एकदा लग्न झाले की, त्याच पुरुषाशी संसार करण्यात इतिकर्तव्यता, असे महिला समजतात. त्यामुळे लग्न करून पश्चावले, अशी मानसिकता किमान अरेंज मॅरेजमध्ये तरी नसते. झाली तरी तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्या सहन करत असतात.

३. शहरी भारतात लिव्ह इनचे, प्रेमविवाह करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. करिअर, आवडी-निवडीला प्राधान्य दिले जाते. पतीने घरकामात बरोबरीने मदत करावी असे नोकरी, व्यवसाय करणाऱ्या तरुणींना वाटते. त्यांना त्यांची स्पेस जे तरुण देतात, त्यांचा संसार सुखी होत आहे.

लग्न करायचे, पण स्वतंत्र राहायचा वाढतोय ट्रेंड
लग्न करूनही एकत्र न राहता स्वतंत्र राहण्याचा ट्रेंड जपानमध्ये वाढत आहे. बंधने कमीत कमी म्हणजेच मी कसं जगायचं, कसं राहायचं, याचं स्वातंत्र्य मला असले पाहिजे, अशी भावना जपानमधील युवा पिढीत वाढत आहे. त्यातून 'विवाहित, पण विभक्त' ही संकल्पना तिथे लोकप्रिय होत आहे. कायदेशीररीत्या विवाहित असल्याने भावनिक जवळीकता जपता येते, त्याचबरोबर स्वातंत्र्यही अबाधित राहते. करिअर, आवडी-निवडी, छंद जोपासत जीवनसाथीला प्रेम आणि पाठबळ देऊ करणारी, अशी ही व्यवस्था आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Regretting Marriage: Survey reveals unhappiness among Japanese married women.

Web Summary : Japanese survey shows 70% of married women regret their marriage, citing reasons like husband's habits, unequal contribution to household chores, and unmet expectations. This raises concerns about family systems, contrasting with traditional Indian views on marriage. Trends like living separately after marriage are rising in Japan.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न