शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार?; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 18:00 IST

लोकांनी तिसऱ्या टर्ममध्येही बहुमताने २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना निवडून आणण्याचं ठरवलं आहे असं फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यावर अखेर फडणवीसांनी पूर्णविराम दिला आहे. मी पुढील विधानसभा निवडणूक लढणार आणि तीदेखील नागपूरमधूनच असं त्यांनी स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. त्याचसोबत देशातील जनतेने तिसऱ्यांदा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना संधी देण्याचं ठरवलं आहे असंही म्हटलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांनी तिसऱ्या टर्ममध्येही बहुमताने २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना निवडून आणण्याचं ठरवलं आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी लोक त्यांचा विचार बदलणार नाही असा विश्वास व्यक्त केला. पत्रकारांनी पुढील दहा वर्षांत तुम्ही स्वत:ला कुठे पाहता असं विचारल्यावर या प्रश्नावर मी भाजपसोबतच राहील आणि पक्ष मला देईल ती कोणतीही जबाबदारी पार पाडू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचसोबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती त्यांनी दिली. मराठा आंदोलनावरही फडणवीसांनी रोखठोक भाष्य केले.

राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे याला प्राथमिकता आहे. मी सर्व मंत्र्यांना सांगितले, आपण मंत्री म्हणून राज्यात कुठेही तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देणार असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. त्यावर फडणवीसांनी हे उत्तर दिले आहे.

दरम्यान, राज्यातील महापालिका अन्य निवडणुकीबाबत विचारणा केली असता, सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने या निवडणुकांना विलंब होतोय, आम्हालाही महापालिकांच्या निवडणुका हव्यात, कारण ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे पडसाद महापालिकेतही उमटतील. भाजपा आणि सहकारी पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शरद पवार-अजित पवार भेटीवर काय म्हणाले फडणवीस?

दिवाळीनिमित्त शरद पवार-अजित पवार यांची भेट झाली, यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक संबंध महत्त्वाचे असतात. कुणीही कुटुंबात राजकारण आणू नये अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपा