शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक जिल्ह्यांत तिप्पट ऑक्सिजनचा साठा, राजेश क्षीरसागर यांची बैठकीत माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 12:12 IST

प्रारंभी कोरोनाच्या गेल्या दोन लाटांमध्ये आलेले अनुभव आणि आता पुढची तयारीविषयी सांगितले. डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी, आरोग्य विभाग, महापालिका कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या लाटेपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला.

ठाणे : जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण कामांमध्ये लोकोपयोगी कामांची बहुतांशी जिल्ह्यांत कमी दिसून येत असून ग्रामीण तरुणांच्या स्वयंरोजगारांविषयी नावीन्यपूर्ण कामांची कमतरता असल्याची खंत आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचा तिप्पट साठा तयार ठेवण्याचे सूतोवाच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी ठाण्यात केले. याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्मृती स्मारक उद्यान उभारणी व शाहू महाराज कार्याची ओळख करून देणारे उपक्रम राज्यभर राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकण विभागीय जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथील नियोजन भवनमध्ये मंगळवारी पार पडली. कोकण विभागीय आयुक्त नसल्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्यांचे स्वागत केले. दहा वर्षांपूर्वी रत्नाकर महाजन यांच्यानंतर प्रथमच ही बैठक पार पडली. यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्या कार्याची आठवण झाल्याचे सांगितले.

कोल्हापूरनंतर आता कोकणातील जिल्ह्याचा आढावा घेत असून या पद्धतीने राज्यातील सर्वच सहा विभागांमध्ये जिल्हा नियेाजन समितीच्या नावीन्यपूर्ण कामांसह कोरोनाकाळातील उपाययोजनांवर झालेल्या खर्चाचा आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या बैठकीला ठाणेसह मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचा आढावा यावेळी दिला. समाधानकारक काम असल्याचे त्यांनी नमूद केले असले तरी शासनाच्या धोरणानुसार नावीन्यपूर्ण कामांमधील काही कमतरता असल्याची खंत बोलून दाखवली.

प्रारंभी कोरोनाच्या गेल्या दोन लाटांमध्ये आलेले अनुभव आणि आता पुढची तयारीविषयी सांगितले. डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी, आरोग्य विभाग, महापालिका कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या लाटेपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला. 

आगीच्या घटनांमधून सरकारची होते बदनामी
- कोरोनाच्या दोन लाटांमध्ये ऑक्सिजन जास्त लागला. त्यास अनुसरून तिसऱ्या लाटेसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला साठा तिप्पट तयार ठेवण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 
- या कोरोनाच्या कालावधीत हॉस्पिटलला आग लागल्याच्या घटनांमध्येही लोकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे सरकारची फार मोठ्याप्रमाणात बदनामी होते. यामुळे ऑक्सिजन साठा कमी पडू नये यासाठी नियोजनाच्या सूचना दिल्या.
 

 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस