शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
5
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
6
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
7
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
8
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
9
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
10
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
11
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
12
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
13
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
14
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
15
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
16
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
17
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
18
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
19
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
20
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला अवकाळीचा फटका, द्राक्षबागा, आंब्याचे नुकसान, पंचनाम्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 05:06 IST

हवामान खात्याने आणखी पावसाचा इशारा दिल्याने चिंतेत वाढ झाली आहे.

मुंबई/नागपूर/जळगाव/औरंगाबाद -  संपूर्ण मराठवाडा, विदर्भासह खानदेशला मंगळवारी अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा बसला असून शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. उतरणीला आलेल्या द्राक्षबागासह केळी व आंबा पिकाला फटका बसला असून ज्वारी, गव्हू ही उभी पिकेही जमीनदोस्त झाली. हवामान खात्याने आणखी पावसाचा इशारा दिल्याने चिंतेत वाढ झाली आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी खान्देशातील नुकसानीची पाहणी केली असून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
मराठवाड्यात गारपीट
मराठवाड्याला मार्च महिन्यात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा फटका बसला असून, त्याचा परिणाम रबी हंगामातील हाताशी आलेल्या पिकांवर झाला आहे. बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत काही ठिकाणी गारपीटही झाली. औरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यात अवकाळी पाऊस कमी-अधिक प्रमाणात बरसला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात विभागातील ५४ मंडळांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. औरंगाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील काही गावांत गारपीटही झाली होती. या अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा, ज्वारीसह द्राक्ष व आंब्याला बसला आहे. हाती आलेला गहू अडवा झाला आहे. विभागात अवकाळी पाऊस बरसणार असल्याचे हवामान खात्याने भाकीत केले आहे. त्यामुळे पिके उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.

आॅक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने मराठवाड्यातील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान केले होते. गहू, हरभरा, ज्वारी काढणीला आलेली असताना पावसाने त्या पिकांचे नुकसान केले. पीक विमा अर्ज ४८ तासात भरा ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा पीक विमा काढलेला आहे, अशा शेतकºयांनी तातडीने नुकसानीबाबत विहित नमुन्यातील पीक नुकसान सूचना फॉर्म पूर्ण भरुन ४८ तासांच्या आत विमा कंपनीकडे अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहनही त्यांनी शेतकºयांना केले.

विदर्भात धानाचे नुकसान
विदभातील गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारच्या मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास वादळी वाºयासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे पुन्हा एकदा धान खरेदी केंद्रांवर शेतकºयांच्या धानाची दाणादाण उडाली. नागरी पुरवठा मंत्रालयाकडून इतर जिल्ह्यांना तांदूळ पुरवठा करण्याचा आदेश गडचिरोलीच्या पुरवठा विभागाला मिळाला नसल्यामुळे धान भरडाई बंद असून त्यामुळे अनेक खरेदी केंद्रांवर धान उघड्यावर पडून आहे.

खान्देशात केळीचे नुकसान
जळगाव : धुळे व जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे तापी काठावरील गावातील केळी, गहू, मका, बाजरी, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून विजेचे खांब, वृक्ष उन्मळून पडले असून जनावरेही दगावली. दरम्यान, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आणि या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

गारपिटीची आणखी शक्यता
छत्तीसगड आणि सभोवताली ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. पूर्व विदर्भ ते तामिळनाडू द्रोणिय स्थिती आहे. त्यामुळे विदर्भात २१ मार्चपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, विजांच्या गडगडाटासह पाऊस व तुरळक ठिकाणी गारपीटची शक्यता आहे. शेतकºयांनी कळजी घ्यावी, असे आवाहन भारतीय हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र