शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र म्हणजे गौरवशाली इतिहास, सशक्त वर्तमान अन् समृद्ध भविष्याचे स्वप्न- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 20:25 IST

PM Modi in Mumbai Nesco: या विकासप्रकल्पांमुळे १० लाख रोजगार उपलब्ध होणार!

PM Modi in Mumbai Nesco ( Marathi News ) : मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकूण २९,४०० कोटींहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपुजन करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे तोंडभरून कौतुक केले. "महाराष्ट्र हे असे राज्य आहे ज्याचा विकसित भारत घडवण्यात मोठा वाटा आहे. महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्राचे वर्तमान सशक्त आहे. महाराष्ट्राला समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. महाराष्ट्राची विकसित भारत घडवण्यात मोठी भूमिका आहे."

१० लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार

पुढे पंतप्रधान म्हणाले, "आज मला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी ३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि आसपासच्या भागांची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल. रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांव्यतिरिक्त , महाराष्ट्रातील तरुणांच्या कौशल्य विकासासाठी २-३ आठवड्यांपूर्वी केंद्र सरकारनेही या प्रकल्पाला मान्यता दिली असून या प्रकल्पामुळे येथे १० लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत."

"२१व्या शतकातील भारताच्या आकांक्षा सध्या खूप उच्च पातळीवर आहेत. या शतकात जवळपास २५ वर्षे उलटून गेली आहेत. देशातील जनतेला सतत वेगवान विकास हवा आहे. येत्या २५ वर्षांत भारताचा अधिक वेगाने विकास व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यानुसार देशात विकासकामे होत राहतील," अशा शब्द त्यांनी मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनतेला दिला.

इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवर्सचेही उद्घाटन

इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवर्सच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "इंडियन न्यूजपेपर सोसायटी स्वातंत्र्यापूर्वीपासून अस्तित्वात आहे. देशाच्या प्रवासातील प्रत्येक चढ-उतार तुम्ही जवळून पाहिले आहेत, ते जगले आहेत आणि लोकांना सांगितले आहेत. एक संघटना म्हणून तुमचे काम जितके प्रभावी होईल तितका देशाला फायदा होईल. एक वेळ होती जेव्हा नेते उघडपणे म्हणायचे की डिजिटल व्यवहार भारतातील लोकांच्या आवाक्यात नाहीत. पण जग भारतातील लोकांचे चातुर्य आणि सक्षमता पाहत आहे. आज भारत डिजिटल व्यवहारात मोठे विक्रम मोडत आहे. यामुळे लोकांच्या राहणीमानात वाढ झाली आहे हे संपूर्ण जग मान्य करेल," असे पंतप्रधान मोदी यांनी ठणकावून सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार