शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच लाख वैदर्भीय शेतकऱ्यांना महावितरणची कृषी संजीवनी

By admin | Updated: June 29, 2014 00:37 IST

महावितरणद्वारे राबविली जाणारी व यशस्वी झालेली कृषी संजीवनी योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेमुळे विदर्भातील सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना संजीवनी मिळणार आहे.

प्रभाकर गायकवाड - वर्धामहावितरणद्वारे राबविली जाणारी व यशस्वी झालेली कृषी संजीवनी योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेमुळे विदर्भातील सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना संजीवनी मिळणार आहे. विदर्भातील शेतकऱ्यांकडे कृषिपंपाचे एकूण ११०० कोटी रुपये बील थकीत आहे. पैकी ६०० कोटींचे व्याज माफ होणार आहे़ ही योजना पुनर्जीवित करण्याची घोषणा शासनाने अर्थसंकल्पात केली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. यात ६०० कोटींचे व्याज माफ होणार आहे. राज्यासह विदर्भातील कृषी पंप धारकांकडे वीज देयकांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत.ही थकबाकी वसूल करण्याकरिता महावितरणतर्फे कृषी संजीवनी योजना राबविण्यात आली होती. या योजनेत वीज देयक थकीत असणाऱ्या कृषी पंप धारकांचे व्याज माफ होणार होते. शिवाय केवळ सुरू देयकाचाच भरणा करायचा होता. राज्यात सर्वत्र दोन वेळा ही योजना राबविण्यात आली.तथापि, या योजनेचा फारसा लाभ विदर्भातील कृषी पंपधारकांनी घेतला नाही. यामुळे ऊर्जामंत्री अजित पवार यांनी या योजनेला पुन्हा एकदा संजीवनी देण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास ११०० पैकी ६०० कोटी रुपयांचे व्याज माफ होऊन शेतकरी व महावितरणला संजीवनी मिळणार आहे़