शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
8
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
9
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
10
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
11
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
12
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
13
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
14
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
15
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
16
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
17
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
18
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
19
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
20
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार! २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 06:28 IST

पुन्हा फडणवीस सरकार की, सत्तांतर होणार?; आघाडीचं ठरलं, युतीचं घोडं का अडलं?; मनसेच्या ‘राजगडा’ला केव्हा जाग येणार?

नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून दोन्ही राज्यांत २१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे; तर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदारराजाने दिलेला कौल धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येलाच निकालाच्या स्वरूपात जाहीर होईल आणि ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर नवे सरकार सत्तारूढ होण्याचा मार्ग मोकळा झालेला असेल. राज्यातील सुमारे नऊ कोटी मतदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पुन्हा संधी देणार की, २०१४ प्रमाणे राज्यात सत्तांतर घडवून आणणार, याची संपूर्ण देशाला उत्सुकता लागून आहे.

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसह देशातील ६४ विधानसभा आणि बिहारमधील समस्तीपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी नवी दिल्ली येथे जाहीर केला. त्यानंतर लगेच आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लांबणीवर टाकली. महाराष्ट्राच्या १३व्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो. राज्यातील २८८ जागांसाठी मतदान होणार असून, त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रे असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.

तीन आजी-माजी मुख्यमंत्री पुन्हा रिंगणात
या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अशोक चव्हाण (भोकर) आणि पृथ्वीराज चव्हाण (कºहाड) हे तीन आजी-माजी मुख्यमंत्री पुन्हा रिंगणार उतरणार असून, या मतदारसंघातील लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

वंचित फॅक्टर चालणार का?
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत सात ते आठ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग रोखला होता. मात्र, त्या वेळी एमआयएमसोबत त्यांची युती होती. आता ही युती संपुष्टात आल्याने विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर किती चालणार, याविषयी उत्सुकता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करणार?
लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता प्रचारसभा घेऊन मोदी सरकारवर तोफा डागलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख विधानसभा निवडणूक लढविणार का, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मनसे शंभर जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात येते, मात्र या १०० जागा कोणत्या, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
२७ सप्टेंबर (शुक्रवार)- उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
४ ऑक्टोबर (शुक्रवार)- अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
५ ऑक्टोबर (शनिवार)- अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर (सोमवार)- अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
१९ ऑक्टोबर (शनिवार)- प्रचाराचा शेवटचा दिवस
२१ ऑक्टोबर (सोमवार)- मतदान
२४ ऑक्टोबर (गुरुवार)- निकाल

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस