शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

Vidhan Sabha 2019: मनसेच्या बदललेल्या पवित्र्यामागे चाणक्यनीती की अदृश्य टाळी?

By संदीप प्रधान | Published: September 23, 2019 3:59 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेना १०० जागांवर उमेदवार उभे करणार, अशी चर्चा आहे.

- संदीप प्रधान मुंबई : मनसैनिकांच्या दबावापोटी म्हणा किंवा ईडीच्या धाकाने म्हणा किंवा अस्तित्वाच्या लढाईकरिता, ठाकरेबंधूंमधील प्रेमापोटी म्हणा राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत उमेदवार रिंगणात उभे करण्यास तयार झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना १०० जागांवर उमेदवार उभे करणार, अशी चर्चा आहे. विधानसभेच्या २८८ जागा असून त्यापैकी केवळ १०० कोणत्या जागांवर मनसे लढणार ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावरच स्पष्ट होईल. त्यानंतरच मनसेच्या बदललेल्या भूमिकेमागील प्रेरणा कोण, ते स्पष्ट होईल.मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नाही. मात्र, राज यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला. त्यानंतरही अनुकूल निकाल न लागल्याने राज यांनी ईव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित केला. निकाल जर फिक्स असेल, तर निवडणुका कशाला लढवायच्या, असा सवाल करणाऱ्या राज यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना स्वत:कडील पैसे जपून वापरण्याचे आवाहन केले होते.राज यांच्या भाजपविरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर त्यांना ईडी चौकशीची नोटीस आली. त्यांचे निकटवर्तीय उन्मेष जोशी, राजन शिरोडकर व नितीन सरदेसाई यांनाही ईडीच्या कार्यालयात चकरा मारायला लागल्या. त्यावेळीच अशी चर्चा सुरू झाली होती की, सत्ताधारी भाजपने युती केली किंवा तोडली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मनसे रिंगणात हवी आहे. युती तोडल्यानंतर शिवसेनेच्या काही उमेदवारांच्या विरोधात मनसेचे उमेदवार रिंगणात असतील, तर मराठी मतांच्या विभाजनाचा लाभ भाजपच्या उमेदवारांना होऊ शकतो किंवा युती असतानाही शिवसेनेला मनसेच्या उमेदवारांमुळे झटका लागला, तर शिवसेना मागील वेळेसारखी ६३ जागांवर मजल मारणार नाही. त्यामुळे आता मनसेने शिवसेनेच्या मतदारसंघात उमेदवार दिले, तर या खेळीमागे भाजपचे चाणक्य असल्याचे स्पष्ट होईल.दुसरा तर्क असाही आहे की, राज हे निवडणूक लढवायला उत्सुक नव्हते, मात्र शिवसेनेने त्यांच्या व मनसेच्या अस्तित्वाची ही लढाई असल्याचे लक्षात आणून दिल्याने राज यांनी लढायला अनुकूलता दाखवली आहे. ठाण्यातील नौपाडा येथील बिल्डर हसमुख शहा याने अलीकडेच राहुल पैठणकर या मराठी ब्राह्मण व्यक्तीला किरकोळ कारणावरून मारहाण केली. लागलीच मनसेने या वादात उडी घेत शहाला इंगा दाखवला. सध्या दोन्ही सेनांचा मुख्य शत्रू भाजप असून त्याचे नेतृत्व दोन गुजराती व्यक्ती करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहा याला इंगा दाखवण्यामागे शिवसेना व मनसे यांची आतून हातमिळवणी तर नाही ना, अशी शक्यताही नाकारता येत नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस