शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:30 IST

राजीनाम्यानंतरही या अधिकाऱ्यांना एक आठवडा पदावर कायम राहण्याचे निर्देश आहेत.

चेन्नई - तामिळनाडूत नवीन सरकारच्या स्थापनेबाबत अनिश्चितता असताना एका घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारची बाजू मांडणाऱ्या १०० हून अधिक विधी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी पश्चिम बंगालमध्येही अनेक अधिकाऱ्यांनी नोकरी सोडली होती. तिथे पहिल्यांदाच तृणमूल काँग्रेसचं सरकार पायउतार होत भाजपा राज्यात सत्तास्थापन करत आहे.

तामिळनाडूत एडवोकेट जनरल पी.एस रमन यांच्या नेतृत्वात या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारी वकील आणि विधी अधिकाऱ्यांची नियुक्ती बहुतांश राजकीय असते. परंपरेनुसार जेव्हाही एखाद्या राज्यात सत्ता परिवर्तन होते तेव्हा नवीन सरकार येताच मागील सरकारद्वारे केलेले नियुक्त अधिकारी त्यांचे पद सोडतात. त्यानंतर नवीन सरकार त्यांच्या मर्जीतील लोकांची या पदांवर निवड करते. 

...तोपर्यंत काम करत राहणार सर्व वकील

राजीनाम्यानंतरही या अधिकाऱ्यांना एक आठवडा पदावर कायम राहण्याचे निर्देश आहेत. कोर्टात राज्य सरकारची बाजू मांडणारे वकीलच नाही असं व्हायला नको म्हणून ही सूचना करण्यात आली आहे. सामान्यत: नवीन सरकार अंतरिम व्यवस्था म्हणून ३-४ वकिलांची नियुक्ती करते परंतु विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे सरकार येण्याबाबत अद्याप सस्पेन्स आहे. त्यामुळेच अजून कुणाचीही नियुक्ती केली नाही. एका विधी अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्याला कोर्टामध्ये कुठल्याही प्रतिनिधीशिवाय सोडले जाऊ शकत नाही. त्यासाठीच आम्ही जोपर्यंत नवीन सरकार येऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती करत नाही तोवर आम्ही काम करू असं त्यांनी सांगितले.

नियमानुसार, नवीन सरकारचा शपथविधी होईल तसे पक्षाशी निगडित अनुभवी वकिलांची या महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करू शकते. सध्या तामिळनाडू सरकारकडून कोर्टात बाजू मांडणारे १०० हून अधिक विधी अधिकाऱ्यांची फौज आहे. ज्यांचे भविष्य नव्या सरकारवर अवलंबून आहे. तामिळनाडूत थलापती विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यांनी १०८ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र बहुमतासाठी लागणारा ११८ आकडा गाठणे त्यांच्यासाठी कठीण झालं आहे. त्यामुळेच नव्या सरकारबाबत अजून साशंकता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tamil Nadu: Mass Resignations Follow Bengal; Over 100 Officials Quit

Web Summary : Following West Bengal, over 100 Tamil Nadu legal officers resigned amid government uncertainty. Tradition dictates resignations after regime change, awaiting new appointments. Current officers will continue until replacements arrive due to political suspense.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूThalapathy Vijayथलपती विजयWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६