शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची; जनमत २४ तारखेलाच मिळणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 19:37 IST

या सरकारला घालवायचं परिवर्तन करायचं यासाठीच मतदान झालं आहे. ज्या ज्या वेळी टक्केवारी वाढतेय तेव्हा परिवर्तन निश्चित असतं

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध चॅनेल्सने दिलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असून महाआघाडीला मोठा फटका बसताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी महायुतीला २०० च्यावर जागा मिळतील आणि आघाडीला ७० जागा मिळणेही कठीण होईल अशी आकडेवारी दिली आहे. मात्र एक्झिट पोलमध्ये तथ्य वाटत नाही, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा सर्व आघाडीवर सरकार अपयशी राहिलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला जो प्रतिसाद राज्यात मिळाला आहे. निश्चितच जनमत २४ तारखेला आघाडी मिळेल. त्यामुळे ही आकडेवारी संपूर्ण चुकीची आहे अशा शब्दात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

याबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, शिवस्मारक, इंदु मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशा अनेक मुद्द्यावर राज्य सरकारला बोलण्यासारखं काहीच नाही. जनसंघर्ष, हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून राज्यभर यात्रा काढली, लोकांच्या मनात नक्कीच बदलाचं वातावरण आहे. महागाईची झळ लोकांना बसली आहे. या सरकारला घालवायचं परिवर्तन करायचं यासाठीच मतदान झालं आहे. ज्या ज्या वेळी टक्केवारी वाढतेय तेव्हा परिवर्तन निश्चित असतं. एक्झिट पोलचे आकडेवारी फोल ठरतील हे २४ तारखेला दिसेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच भाजपाचे जे लोकं निवडणुकीला उभे होते ते मतदारसंघ सोडून फिरले नाही, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट हे सगळे नेते राज्यभर फिरले. १५ वर्षात आम्ही इनकमिंग केलं नाही कारण सत्तेचा गैरवापर आम्ही कधीच केला नाही जर तो वापर केला असता तर नक्कीच तुमच्यातील बरेच नेते आमच्या पक्षात आले असते. भाजपाचे सगळे बंडखोर शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी सक्रीय होते. हे उघड आहे असा आरोप सतेज पाटील यांनी भाजपा नेत्यांवर केला आहे. 

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आयात करण्याची गरज का पडली? तुमच्या सरकारचा ५ वर्षाचा कारभार नव्हता. त्यामुळे जिंकणारे उमेदवार भाजपात घेतले पण लोकांना हे सगळं पाहिलं आहे. लोकांनी मतदानातून त्याचं उत्तर दिलं आहे. येत्या २४ तारखेला त्याचं उत्तर मिळालं. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह भाजपाच्या एकाही नेत्यांनी राज्याच्या कारभारावर मतं मागितली नाहीत. देशाच्या प्रश्नावर राज्यातील जनतेचं पोट कसं भरणार? असंही सतेज पाटील यांनी सांगितले. 

महत्वाच्या बातम्या

विधानसभा निवडणुकीचे सर्व 'एक्झिट पोल' एका क्लिकवर

महायुती सत्ता राखणार; द्विशतक गाठणार; महाआघाडी पुन्हा सत्तेपासून दूर

 नवे सरकार हे महायुतीचेच; सट्टेबाजाराचा अंदाज

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019