शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 12:30 IST

Jayant Patil News: विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना जयंत पाटलांनी बंडखोर उमेदवारांना बळ देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना जयंत पाटील यांनी खडेबोल सुनावले. 

Maharashtra Election Jayant Patil News : 'कुठल्याही परिस्थिती अधिकृत उमेदवारांसाठी ताकद लावली पाहिजे', असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी बंडखोरांना बळ देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला. काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 

औदुंबर येथे महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत बोलताना जयंत पाटलांनी महायुतीवर टीकास्त्र डागलं. तर महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकाऱ्यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले. 

जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

"आम्ही लहानपणापासून इतिहास काय वाचला की, महाराष्ट्राची स्वारी छत्रपती शिवाजी महाराज हे गुजरातला गेले आणि तिथली संपत्ती आणून महाराष्ट्रातील किल्ले उभे करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. पण, देवेंद्र फडणवीस अमित शाहांना बरं वाटावं म्हणून सांगतात की, लुटायला नव्हते आले, आपली भेट घ्यायला आले होते. गुजरातच्या पुढे किती मान खाली घालायची? त्यांना खुश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे बदलायला लागले", असा टोला जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.  

गटबाजीवर भाष्य, जयंत पाटील काय बोलले?

"आपण एकत्रितपणानं, एकसंघपणानं आपले छोटे-छोटे वाद, एकमेकांच्या विरोधात लढणं, छोटं राजकारण थोडंस बाजूला ठेवा. लढायला भरपूर आयुष्य आहे सगळ्यांना. आता मात्र काँग्रेसचा उमेदवार, राष्ट्रवादीचा (शरद पवार) उमेदवार, शिवसेनेचा (ठाकरे) उमेदवार या महाराष्ट्रात उभा करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करू", असे म्हणत जयंत पाटलांनी महाविकास आघाडीतील गटबाजीवर भाष्य केलं.

सत्ता गेली, तर कुत्रही विचारणार नाही -जयंत पाटील 

ते म्हणाले, "थोडंस मोठं मन ठेवा. काही भांड्याला भांड लागलं असेल, तर थोडंस बाजूला ठेवा आणि कुठल्याही परिस्थितीत अधिकृत उमेदवारांसाठी आपण सगळ्यांनी ताकद लावली... एक-एक आमदार महत्त्वाचा आहे सांगतोय. एकदा का सत्ता गेली ना, कुत्र पण विचारणार नाही. एक सांगतो लय गंमती करू नका. कदम साहेब असं म्हणायचे. एकदा घोटाळा झाला ना, भरून येणार नाही. आणि जेवढे आम्ही आज आवाज काढून बोलतोय, असली माणसं परत आवाज काढणार नाही. निवांत घरात जाऊन बसतील. रिटायर होतील", असे जयंत पाटील म्हणाले.

 

मुख्यमंत्रिपदाबद्दल जयंत पाटील काय म्हणाले?

"छोट्या-छोट्या गोष्टी मन अडकवू नका. आपण सगळ्यांनी ताकद लावली, तरच सरकार येणार आहे. सरकार आल्यानंतर तुम्हाला पाहिजे, त्याला मुख्यमंत्री करा. काही घाई नाही कुणाची", अशा शब्दात जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024palus-kadegaon-acपलूस कडेगावJayant Patilजयंत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडी