शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 15:03 IST

आपल्याकडे चांगले हॉटेल्स येत नाहीत. काहीही न करता तुम्ही मतदान करत असाल तर कशाला कुणी काही करेल. पिढ्या बर्बाद करून टाकाल असं राज ठाकरे यांनी म्हटलं. 

गुहागर - कोकणात कधीही आलं तरी हे कोकण भुरळ घालतं. ७५० किमी समुद्रकिनारा लाभलेलं हे कोकण, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. जे परमेश्वराने आपल्याला दिलंय त्याकडे आपलं लक्ष नाही. फक्त पर्यटनावर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात. तुम्ही कल्पना केली नसेल इतकं सुंदर कोकण होऊ शकतं. तुम्हाला गाव सोडावं लागणार नाही, तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सगळे इथेच मिळेल असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणच्या जाहीरसभेत सांगितले.

गुहागर येथे मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते म्हणाले की, परदेशात ज्याप्रकारे समुद्रकिनारे विकसित झालेले पाहतो, पण परमेश्वराने हे कोकणाला दिलं मग आपल्याकडे का होत नाही, चुकीची माणसं आजपर्यंत निवडून दिली, ज्यांनी स्वत: काही केले नाही. आपापली खळगी भरत आले. मोठे झाले, यांचे अनेक फार्म हाऊस झाली, कोकणात उद्योगधंदे नसल्याने तरुण मुंबई, पुण्याकडे निघून जातात. विदर्भ, मराठवाडा सगळीकडे हेच. दर ५ वर्षांनी निवडणूक येते, आज इथं चिमुरडी बोर्ड घेऊन थांबलीय, ५ वर्षाने तिचे वय वाढेल. किती वर्ष आपण त्याच त्याच विषयावर निवडणूक लढवणार आहोत, प्रत्येकजण सांगतो, रोजगार आणू मग आतापर्यंत का आणला नाही. निवडून दिलेल्या आमदारांना तुम्ही प्रश्न विचारत नाही. इथली माणसं मुंबई, पुण्यात का जातायेत हे का विचारले जात नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं.

तसेच केरळात जा, अख्खं राज्य पर्यटनावर सुरू आहे, तिथे कुठे रिफायनरी आली, पर्यटनावर गोवा राज्य सुरू आहे. इतकं सुंदर कोकण करता येईल. ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. ना तुम्हाला घर सोडावे लागेल, ना गाव सोडावे लागेल, तालुका सोडावा लागेल, तुम्हाला जे काही असेल इथेच मिळेल. आतापर्यंत हे का झाले नाही कारण तुम्ही त्याच त्याच लोकांना, त्याच त्याच पक्षांना निवडून देता. तुम्ही खासदार, आमदार निवडून देता, दिल्लीत खासदार कोणते प्रश्न मांडतात, कोकण पर्यटनावर किती प्रश्न मांडले गेले. कोकणाचा कॅलिफोर्निया करू असं राजकारणी बोलत होते, पण त्याचे पुढे काय झाले. आपल्याकडे चांगले हॉटेल्स येत नाहीत. काहीही न करता तुम्ही मतदान करत असाल तर कशाला कुणी काही करेल. पिढ्या बर्बाद करून टाकाल. राज ठाकरे हा ओरडून तुम्हाला सतत सांगतोय, तुम्ही महाराष्ट्राचे नागरीक आहे. ज्याचा इतिहास एवढा मोठा, स्वाभिमानी कणा राज्याचा मोडून टाकला. आपल्याला काही दु:ख नाही. आज तुम्ही असे वागता, म्हणून हे राजकारणी असे वागतात. तुमचा विचार नाही, राज्याचा विचार नाही. काय उद्योग आपल्याकडे आले पाहिजे याचा विचार नाही. फक्त राजकारणात गुंतले गेलेत. ५ वर्ष तुम्ही तमाशा बघताय, इथला पक्ष तिथे जातो, तिथला पक्ष इथे येतो, हे आमदार विकले जातात वैगेरे हे ५ वर्ष तुम्ही पाहताय. सगळे टोकदार प्रश्न मनसेला विचारले जाणार बाकीच्यांना प्रश्न विचारताना बोथट झाली आहे असं संतप्त भावना राज यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, एकेकाळी पत्रकार, संपादकांना राजकारणातील लोक घाबरायचे. एक भीती असायची, आता कुणाबद्दल राजकारण्यांना भीती उरली नाही. जनतेची भीती नाही मग पत्रकारांना का घाबरणार, उन्हातान्हात तुम्ही रांगेत उभं राहून त्याच त्याच लोकांना मतदान करणार मग ते का घाबरतील. माणसे जिवंत आहेत की पुतळे आहेत हेच कळत नाही. नुसते जाताय आणि मतदान करताय, आमचा जो काही प्रदेश आहे त्यात तुम्ही काय केले हे विचारावे वाटत नाही. तुम्ही थंड बसला आहात, तुम्हाला स्वत:ला विकास म्हणजे काय हे माहिती नाही. तुमचे आजोबा, तुमचे वडील, तुम्ही त्याच त्याच गोष्टी ऐकून मतदान करता, नेमका विकास म्हणजे काय असतो हे निवडणूक झाली ना मी तुम्हाला इथं येऊन दाखवणार आहे. नाशिकमध्ये आम्ही जे काम केले, तिथे लोकांना आता मनसेला मत न देऊन चुकल्यासारखे वाटतंय, नाशिकमध्ये आमच्या ५ वर्षाच्या काळात ना त्याच्या आधी काम झाले होते, ना आता कुणी करत आहे. आमचा कोकणचा रस्ता १७-१८ वर्ष झाली, सुरूच आहे. आम्हाला राग येत नाही. काही वाटत नाही. दरवर्षी मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे रस्त्यावरील खड्डे पडलेले दाखवतात. नाशिकमध्ये रस्त्यावर खड्डे पडलेत का ते बघा. नाशिकमधील रस्त्यांवर खड्डे सापडणार नाहीत. ज्यावेळी रस्त्यांची कंत्राटे दिली, तेव्हा आयुक्तांसमोर कंत्राटदारांना बोलावले, तुम्हाला कंत्राटे दिली जातायेत, तुम्हाला कुणी पैसे मागितले का विचारले. हे सगळी कंत्राटे तुम्हाला दिल्यानंतर जर मला रस्त्यात खड्डा दिसला तर त्या खड्ड्यात उभा करून मारेन असं त्यांना बजावले असंही राज ठाकरेंनी सांगितले.

कोकणात ताकद, पण पक्ष आणि तीच तीच माणसं बदलावी लागतील 

कोकणातील रस्त्यांबाबत नितीन गडकरींना मी फोन केला. इतकी वर्ष रस्त्याचे काम होत नाही, वाहतूक कोंडी होते, खड्ड्यांमुळे लोकांना त्रास होतोय, तुम्ही महाराष्ट्रातले, आमचा रस्ता चांगला का होत नाही विचारले, तेव्हा ते म्हणाले कंत्राटदार पळून गेले, कंत्राटामध्ये टक्केवारी होते, त्याच्याकडे पैसे उरले नसतील. अनेक कारणे असतील पण रस्ता झाला नाही. आमचा कोकणी माणूस साधा, भोळा आहे, कुणाला काही प्रश्न विचारत नाही. तो शोषित आहे. न चिडणाऱ्या, संवेदना नसलेल्या लोकांचे नेतृत्व मला करायचे नाही. तुम्हाला यात सुख मानायचे असेल तर माना. प्रगती काय असते, विकास काय असतो हे एकदा राज ठाकरेंच्या हाती सत्ता देऊन बघा, केरळ, गोवा सगळ्यांना मागे टाकून आपण पुढे जाऊ, इतकी ताकद कोकणात आहे. कोकणात पक्ष बदलावे लागतील, माणसे बदलावी लागतील. त्याच त्याच लोकांना मत देऊन तुमच्या हाती काय लागणार नाही असं कळकळीचं आवाहनही राज ठाकरेंनी जनतेला केले.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४guhagar-acगुहागरratnagiri-acरत्नागिरीMNSमनसेthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024Raj Thackerayराज ठाकरेkonkanकोकणtourismपर्यटन