शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 17:28 IST

जम्मू काश्मीर निवडणुकीच्या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ०.३ टक्के मते तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ०.५ टक्के मते मिळाली आहेत.

जम्मू - जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने बहुमत मिळवलं आहे. याठिकाणी फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सनं ४१ जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसनं ६ जागा जिंकल्या. भाजपाने जम्मू काश्मीरात २९ जागा जिंकल्या असून पीडीपीने ४ आणि अपक्ष ७ आमदार निवडून आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ५० वर्षापासून सक्रीय असलेल्या शिवसेना संघटनेने पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. 

महाराष्ट्रातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात त्यांचे उमेदवार उतरवले होते. निवडणुकीच्या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ०.३ टक्के मते तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ०.५ टक्के मते मिळाली आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरात निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ९ उमेदवार मशाल चिन्हावर निवडणूक लढले होते.

जम्मू काश्मीरात ठाकरेंच्या उमेदवाराला किती मते मिळाली?

डोडा वेस्ट मतदारसंघ - उमेदवार टिळक राज शान - मते १६२जम्मू वेस्ट मतदारसंघ - उमेदवार मिनाश्री चिब्बेर - मते १२६कालाकोट मतदारसंघ - उमेदवार राकेश कुमार - मते १२६बिश्नाह मतदारसंघ - उमेदवार जय भारत - मते ४७५जसरोटा मतदारसंघ - उमेदवार राजेश कुमार - मते १०४रामनगर मतदारसंघ - उमेदवार राज सिंग - मते ७१४उधमपूर ईस्ट मतदारसंघ - उमेदवार साहिल गंडोत्रा - मते ३९७ उधमपूर वेस्ट मतदारसंघ - उमेदवार संजीव कुमार - मते १७०भदरवाह मतदारसंघ - उमेदवार विनोद कुमार - मते १६५

भाजपानं रचला इतिहास

कलम ३७० हटवण्याचा मुद्दा पुढे करत जम्मू काश्मीरात भाजपानं गेल्या निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी केली. मागील निवडणुकीत या राज्यात भाजपानं २५ जागा जिंकल्या होत्या, मात्र यंदाच्या निवडणुकीत या जागांमध्ये वाढ झाली आहे. भाजपानं यावेळी २९ जागांवर विजय मिळवला आहे. त्याशिवाय पक्षाच्या मतांच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे २००८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने भाजपा मतदारांच्या संख्येत वाढ होतानाचे चित्र दिसून येत आहे. २००८ साली भाजपाला १२.४५ टक्के मते मिळून ११ जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर भाजपाच्या मतांमध्ये वाढ झाली. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी २२.९८ टक्के झाली त्यावेळी जागांच्या संख्येतही दुप्पट वाढ पाहायला मिळाली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाjammu and kashmir assembly election 2024जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा