शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:50 IST

वेवजी ग्रामस्थांनी केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्र गुजरात सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे.

पालघर - महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील सीमावाद पुन्हा चर्चेत आला आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात वेवजी गावात गुजरातची घुसखोरी सुरू असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील सीमेवर असणारे वेवजी गावात याठिकाणी गुजरातकडून हळूहळू सीमांकन वाढवण्याचा प्रकार सुरू आहे असा आरोप इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. गुजरातकडून त्यांच्या गावात सीमा वाढवून गाव गिळंकृत करण्याचा डाव आहे असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मागील २५-३० वर्षापासून याठिकाणी सीमावाद आहे. 

वेवजी ग्रामस्थांनी केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्र गुजरात सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. या घटनेची दखल घेत आता दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांकडून सीमा मोजणी सुरू करण्यात आली आहे. पालघरच्या जिल्हा प्रशासनासह गुजरातच्या उंबरगाव तहसिल कार्यालयाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त सीमा मोजणी पार पडते. त्यानंतर गुजरातचं किती अतिक्रमण महाराष्ट्रात आल्याचे हे स्पष्ट होणार आहे. मात्र ऐन हिवाळी अधिवेशनात हा वाद समोर आल्याने मोजणी करून जिल्हा प्रशासन वेळ मारून नेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मात्र हा सीमावाद सोडवण्यासाठी दोन्ही राज्यांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. 

तर गिफ्ट सिटीच्या माध्यमातून अनेक उद्योग गुजरातला गेले. डायमंड मार्केट गुजरातला नेले आता महाराष्ट्रात अतिक्रमण करण्याचं काम गुजरात सरकारकडून होतंय हे दिसून येते. याआधीच बुलेट ट्रेन आलीच आहे. पालघरमधील या प्रकारात प्रशासनाने तातडीने दखल घेत तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधून भूमिका घ्यावी अशी आमची मागणी आहे. दोन्ही राज्यात भाजपाचं सरकार असल्यानं अधिक काळजी वाटते. त्यामुळे प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे आहोत अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली. 

काय आहे प्रकरण?

पालघर जिल्ह्यातील वेवजी ग्रामपंचायत महाराष्ट्राच्या हद्दीत येते. मात्र याठिकाणी गुजरातकडून साधारण ६०० ते ७०० मीटर घुसखोरी करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. मागील अनेक दिवसांपासून गुजरात महाराष्ट्र सीमावाद इथे सुरू आहे. १९९७ पासून या दोन्ही राज्यांचा वाद सुरू आहे. स्थानिकांच्या या आरोपानंतर दोन्ही राज्यांच्या जिल्हा प्रशासनाकडून संयुक्त सीमा मोजणी हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत इमारती बांधल्या आहेत. त्याठिकाणी रस्ते लाईट अन् इतर सुविधा गुजरातकडून दिल्या जातात त्यातून हा वाद समोर आला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gujarat Encroaching on Maharashtra Border Village; Locals Allege Gradual Land Grab

Web Summary : Gujarat is allegedly encroaching on Maharashtra's Veveji village border. Villagers claim Gujarat is gradually expanding its boundary, prompting joint land surveys. Satej Patil expressed concern, urging administrative action to protect Maharashtra's interests. The dispute has been ongoing since 1997.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरातcongressकाँग्रेस