शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

परीक्षेबाबत अंतिम निर्णय कुलपतींचाच; राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 6:52 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिक्षा आणि शैक्षणिक वर्षाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व कुलगुरुंची समिती नेमली होती. या समितीने ६ मे रोजी आपला अहवाल विभागाच्या सचिवांना सादर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यापीठ परिक्षांवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ताठर भूमिका घेतली आहे. परीक्षा रद्द करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा अनपेक्षित आणि प्रथेला धरून नाही. शिवाय, या निर्णयाचे परिणाम आणि कायदेशीर बाबींचा सर्वंकष विचार झालेला नाही, असे सांगतानाच कुलपतीच परीक्षांबाबत अंतिम निर्णय घेतील, असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे पत्रच मंगळवारी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिक्षा आणि शैक्षणिक वर्षाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व कुलगुरुंची समिती नेमली होती. या समितीने ६ मे रोजी आपला अहवाल विभागाच्या सचिवांना सादर केला आहे. हा अहवाल अजूनही कुलपती या नात्याने कुलपतींना सादर करण्यात आलेला नाही. विशेष म्हणज,े व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीत राज्यातील सर्व कुलगुरूंनी आपापल्या परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली होती, याची आठवणही राज्यपालांनी करुन दिली. परिक्षेबाबत या समितीच्या अहवाल आपल्याला सादर झाल्यानंतरच या अहवालातील सर्व शिफारशी अथवा काही स्वीकारून निर्देश जारी केले जातील, असे राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याची केलेली घोषणा ही पदवी परीक्षेबाबतच्या मुलभूत सुत्राला हरताळ फासणारी आहे. एकाच प्रकारची पदवी मिळविण्यासाठी दोन प्रकारचे, वेगवेगळे नियम असू शकत नाहीत. एकाने परिक्षा द्यायची आणि दुसऱ्याने सरासरीच्या आधारे पदवी मिळवायची, असा भेद करता येणार नाही. परीक्षेला पर्यायी प्रक्रिया ठरविता येणार नाही, असेही राज्यपालांनी आपल्या पत्रात नमूद केले.

वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी अशा विविध शाखांतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संबंधित व्यवसायातील मंडळात नोंदणी करावी लागते. परीक्षा झाली नाही तर या संस्था अशा विद्यार्थ्यांना स्वीकारणार नाहीत. त्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यता येईल, याकडेही राज्यपालांनी लक्ष वेधले आहे.मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची प्रतिक्षाराज्यपाल हे राज्यातील विद्यापीठांचे कुलपतीदेखील आहेत. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाशी संबंधित सर्व निर्णयांचे अंतिम अधिकार हे कुलपतींकडे आहेत. याच कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून विद्यापीठ परिक्षांबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. आता मुख्यमंत्री ठाकरे काय उत्तर देतात याची प्रतिक्षा आहे.

टॅग्स :examपरीक्षाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरे