शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाने सांगूनही महायुतीकडून आचारसंहितेचा भंग; 'त्या' २०० निर्णयांची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:23 IST

निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने महायुती सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नुकतीच घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली. अशातच महाराष्ट्रातील महायुती सरकारने आठवडाभरापासून सरकारी निर्णयांची धडाका लावला होता. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही सरकारकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयांची मालिका सुरूच होती. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे आयोगाने बुधवारी जाहीर केले आहे. त्याचवेळी महायुतीने वापरलेल्या 'व्होट जिहाद' या शब्दाचीही आयोग चौकशी करणार आहे.

१५ ऑक्टोबर रोजी दुपारी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सुमारे २०० सरकारी प्रस्ताव, नियुक्त्या आणि निविदा सरकारी वेबसाइटवर प्रसिद्ध केल्यामुळे महाराष्ट्र सरकार अडचणीत आले आहे. हे निर्णय जाहीर करताना महायुती सरकारने आचार आदर्शाचा भंग केल्यामुळे या प्रकरणाची सध्या निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू आहे. आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी निवडणूक आयोगाने तक्रार केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने वेबसाइटवरून अनेक नोटिसा काढून टाकल्या.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. यानंतर बुधवारी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य सरकारकडून दिवसभर शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आयोगाने म्हटलं की यात आमदारांना निधी वाटप आणि इतर अनेक प्रशासकीय मान्यतेशी संबंधित अध्यादेशांचा समावेश आहे. त्यामुळे दुपारी ३.३० नंतर जे काही शासन निर्णय जाहीर केले गेले ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे का, याची तपासणी केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाला लिहीलेल्या पत्रात कुंभार यांनी म्हटलं की महाराष्ट्र सरकारने १५ आणि १६ ऑक्टोबर दरम्यान १०० हून अधिक ठराव वेबसाईटवरुन काढून टाकले. "आधी वेबसाइटवर ३४९ सरकारी ठराव दिसत होते. मात्र आता ही संख्या २४७ पर्यंत कमी झाली आहे. हे ठराव गायब होण्यामागील कारणांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. हे ठराव वेबसाइटवरून काढून टाकणे म्हणजे गैरवर्तनाची कबुली मानली जाऊ शकते," असे कुंभार यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

आचारसंहिता लागू झाल्यावर हे ठराव जाहीर करण्यात आले होते, असा दावा विजय कुंभार यांनी केला आहे. तर याद्वारे जनतेची दिशाभूल केली गेली असेही कुंभार म्हणाले. "जरी प्रस्ताव सरकारी वेबसाइटवरून काढून टाकले गेले असले तरी ते आधीच लागू केले गेले असावेत. त्यांच्या अंमलबजावणीमुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे," असेही विजय कुंभार म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMahayutiमहायुतीAAPआप