शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

प्राधिकरणचा नागरी ग्रामीण विभाग गुंडाळला!

By admin | Updated: May 2, 2015 01:13 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी अखेर नागरी व ग्रामीण विभाग गुंडाळण्यात आला आहे. सोबतच तांत्रिक विभागही

विलास गावंडे, यवतमाळमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी अखेर नागरी व ग्रामीण विभाग गुंडाळण्यात आला आहे. सोबतच तांत्रिक विभागही प्राधिकरणात वर्ग करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातूनच सर्व प्रकारची कामे चालणार आहेत.उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी प्राधिकरणातील विभागीय कार्यालयाचे नागरी-ग्रामीण विभाग, तांत्रिक विभाग असे विभाजन करण्यात आले़ मात्र उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याची उपरती प्राधिकरणला झाली. या विभागासाठी असलेल्यामुख्य अधिकाऱ्यांसाठी वाहन, भत्ते शिवाय कार्यालयाचा दैनंदिन खर्चही वाढला होता. नवीनयोजनांची कामे या विभागाकडे सोपविण्यात आली होती. मात्र विभागाकडे कामेच नसल्याने फारसा उपयोग नव्हता. त्यामुळे हा विभागच बंद करण्याचा निर्णय प्राधिकरणने घेतला. प्राधिकरणच्या वरिष्ठ स्तरावरील बैठकांसाठी जलव्यवस्थापन तसेच नागरी व ग्रामीण विभागाचे अधिकारी उपस्थित राहात होते. दोन्ही अधिकाऱ्यांचा प्रवास, भत्ता आदी बाबींचा खर्च प्राधिकरणला झेपत नव्हता. वास्तविक सुरुवातीपासूनच या विभागाकडे वरिष्ठस्तरावरून दुर्लक्ष राहिले. २० कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ आठ ते दहा कर्मचाऱ्यांच्या भरवशावर गाडा हाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.ही बाबही या विभागाच्या अयशस्वीतेला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. एकीकडे खर्चाचा भार वाढल्याचे कारण पुढे करत नागरी-ग्रामीण विभाग बंद करण्यात आला, तर दुसरीकडे मुख्य अभियंत्यांची सहा विभागीय कार्यालये सुरू करण्यात आली.औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, ठाणे याठिकाणी सदर कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. नागरी व ग्रामीण विभागाचा कर्मचारी वर्ग मुख्य अभियंता कार्यालयाकडे वर्ग केला जाणार आहे. सदर कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांची वानवा होती. तोकड्या यंत्रणेवर कारभार सुरू होता.