शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

पालकांनो, आता शुल्कवाढीला विरोध करणं अवघड होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 6:42 PM

शुल्क विनियमन कायद्यातील तरतुदीमुळे पालकांच्या खिशावर अतिरिक्त भार येण्याची शक्यता

अमरावती : भरमसाठ शुल्क वाढविणाऱ्या शाळांविरुद्ध आता एकट्या पालकास तक्रार करता येणार नाही. शाळांविरूद्ध शुल्कवाढीबाबत तक्रार द्यायची असल्यास एक नव्हे तर, २५ टक्के पालकांची गरज राहील, असे शुल्क विनियमन कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शुल्कवाढ करण्यास शैक्षणिक संस्था चालकांना दरवाजे खुले झाल्याची चर्चा पालकांमध्ये सुरु झाली आहे. राज्य शासनाने घात केला, असा आरोप करण्यात येत आहे.महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वीच्या भाजप सरकारने शैक्षणिक संस्था चालकांच्या बाजुने शुल्कवाढीला झुकते माप दिल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर शुल्क वाढीस शाळा व्यवस्थापनाला विलंब शुल्क व्याजासह आकारण्याची मुभा मिळाली आहे. शाळांच्या मनमानी शुल्कवाढीबाबत पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात गत काही वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. त्यामुळे शाळांच्या शुल्कवाढीवर अंकुश आणण्यासाठी या अधिनियमांची १ डिसेंबर २०१४ पासून अंमलबजावणी करण्यात आली. दरम्यान शुल्क विनियमन कायद्यात काही त्रुट्या असल्याचा आक्षेप घेत यात सुधारणा करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शुल्क विनियमन कायद्याच्या अधिनियमांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही. जी. पळशीकर यांच्या अध्यक्षतेत समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींचा विचार करुन या अधिनियमात शासनाने काही सुधारणा केल्या आहेत. नव्या सुधारणेनुसार शुल्कवाढ विरोधात एकट्या नव्हे तर, २५ टक्के पालक एकत्र येऊन तक्रार करावी लागणार आहे. अन्यथा ही तक्रार निरर्थक ठरेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शुल्क विनियमन कायदा हा शिक्षणाचे बाजारीकरण करण्यास रान मोकळे झाल्याचा आरोप पालकांकडून होत आहे. गत वर्षी नोव्हेंबर महिन्यात या विधेयकाला मान्यता प्रदान करण्यात आली आहे.शुल्क विनियमन कायद्यात सुधारणा म्हणजे पालकांच्या घटनात्मक अधिकारावर गदा आणली आहे. नव्या सुधारणेत शैक्षणिक संस्थांना झुकते माप दिले आहे. शुल्कवाढीला विरोध करण्यासाठी पालकांची संख्या जुळविताना दमझाक होणारी आहे.- राजेश सपकाळे, पालक अमरावती

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण