शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला राष्ट्रवादीचा 'दे धक्का'; निवडणुकीच्या तोंडावरच पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 18:41 IST

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने दिलेला हा ‘पंच’ शिवसेनेसाठी धक्काच मानला जातोय.  

अहमदनगर/मुंबईः राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये छोट्या-मोठ्या विषयांवरून कुरबुरी सुरू असल्याची, खटके उडू लागल्याची चिन्हं दिसत आहेत. काँग्रेसची नाराजी अनेकदा समोर आली आहेच, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मतभेदांची चर्चाही राजकीय वर्तुळात ऐकू येतेय. अशातच, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतलाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने दिलेला हा ‘पंच’ शिवसेनेसाठी धक्काच मानला जातोय.  

पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेचे पाच नगरसेवक आज बारामतीला पोहोचले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. डॉ. मुदस्सीर सय्यद, किसन गंधाडे, नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने आणि वैशाली औटी यांच्यासह शिवसेनेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला.

‘मी तुम्हाला एकदाच सांगतोय...नाही तर परिणाम भोगावे लागतील': उपमुख्यमंत्री अजित पवार

काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचे मंत्रीही उद्धव ठाकरेंवर नाराज; पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला!

राज्याच्या सत्तेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याआधी पारनेरमध्ये या दोन पक्षांनी सत्तेचं गणित जमवलं होतं. आता मात्र राष्ट्रवादीनं एकहाती सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी अलीकडेच जामखेडमध्ये भाजपाच्या नगरसेवकांना आपल्या ताफ्यात घेतलं. त्या पाठोपाठ, पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी सत्तेत सोबत असलेल्या शिवसेना शिलेदारांच्या हातावरच घड्याळ बांधलंय. शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यासाठी हा धक्का ठरू शकतो.

प्रिया बेर्डेंची राजकारणात एन्ट्री; सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात घेणार राष्ट्रवादीचा झेंडा हाती

भाजपा प्रदेश कार्यकारिणी: खडसे, तावडे, मेहतांना पुन्हा डावलले; पंकजा वेटिंगवर, बावनकुळेंचे जमले

नगराध्यक्षपदावरून नगरसेवक आणि विजय औटी यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे शिवसेना नगरसेवकांनी राष्ट्रवादीची वाट धरल्याचं बोललं जातंय. मात्र, तालुक्यासोबतच शहरातही वर्चस्व वाढवण्यासाठी निलेश लंके यांनी ही खेळी केल्याचीही कुजबूज आहे. आता नगरपंचायतीत शिवसेनेचे फक्त दोन नगरसेवक उरलेत. त्यामुळे पुढची निवडणूक त्यांच्यासाठी कठीण असेल.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे