शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
3
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
4
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
5
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
6
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
7
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
8
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
11
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
12
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
13
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
14
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
15
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
17
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
18
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
19
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
20
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
Daily Top 2Weekly Top 5

टोलविरोधी लढा, विद्यार्थ्यांना आवाहन

By admin | Updated: January 14, 2015 23:19 IST

निवास साळोखे : महावीर कॉलेजमध्ये व्याख्यान

कोल्हापूर : टोलमुक्ती हा कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. टोलमुक्त झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. राज्यात अडीच महिने झाले नवीन भाजप सरकार सत्तेवर आले आहे. त्यांनी टोलप्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले असले तरी अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे कोणत्याही स्थितीत टोल घालवणारच. त्यासाठी विद्यार्थ्यांनी साथ द्यावी, असे आवाहन आज, मंगळवारी सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी येथे केले.
महावीर महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या वतीने ‘कोल्हापूर शहर रस्ते विकास आणि टोल आंदोलन दशा व दिशा एक भौगोलिक अभ्यास’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. प्राचार्य संभाजीराव कणसे अध्यक्षस्थानी होते. डॉ. मंजिरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी नाथाजी पोवार उपस्थित होते.
निवास साळोखे म्हणाले, विद्यार्थी दशेपासून आम्ही चळवळीत काम करीत आहोत. त्यामुळे टोल आंदोलन हे काय नवीन वाटत नाही. गेल्या पाच वर्षांत या आंदोलनातून समितीतील कार्यकर्त्यांवर दरोड्यासारखे गुन्हे पोलीस प्रशासनाने घातले. आम्ही तुम्हाला दरोडेखोर वाटतो का? असा प्रश्न करून ते म्हणाले, आय.आर.बी. कंपनी खंडणीप्रमाणे पैसे गोळा करत आहे. कंपनीला ठेका देण्यासाठी मंत्रालयापासून महापालिका आणि मंत्र्यांपासून ते शिपायापर्यंत अशी साखळी आहे. या साखळीद्वारे हा कारभार सुरू आहे. यातून मंत्री आपली दिवाळी तर कोल्हापूरकरांचा शिमगा होत आहे. गत काँग्रेस आघाडी सरकारमधील जिल्ह्णातील दोन मंत्री यांनी विधानसभेपूर्वी टोल पंचगंगेत बुडवू असे आश्वासन दिले होते. पण, त्यांनी टोल मुक्ती केली नाही. त्यांना जनतेने जागा दाखविली. परंतु, सध्या राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने अद्याप टोलमुक्तीचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्यांनीसुद्धा लवकरच टोलमुक्ती करावी अन्यथा त्यांना भविष्यात त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा साळोखे यांनी दिला.
प्रा. डॉ. अरुण पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी विभागाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. शशिकांत पाटील यांनी आभार मानले.