शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अंबाबाई मंदिर जतन संवर्धनासाठी पहिल्या टप्प्यातील १४३ कोटी मंजूर, काम पूर्ण करण्याची मुदत किती.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:35 IST

पहिल्या टप्प्याला नियोजनची प्रशासकीय मान्यता

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील १४३.९० कोटींच्या आराखड्याला गुरुवारी नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. या अंतर्गत पुरातत्व खात्याच्यावतीने अंबाबाई मंदिराचे मूळ दगडी बांधकाम, गळती, शिल्पांचे जतन संवर्धनाची कामे करून मूळ ढाच्याचे सक्षमीकरण केले जाणार आहे. यातील प्रस्तावित कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन विभागाने ३१ मार्च २०२८ पर्यंतची मुदत दिली असून संनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत.

श्री अंबाबाई मंदिराच्या १४४५ काेटींच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ६ मे २०२५ रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आराखड्याच्या कार्यवाहीचे टप्पे व कामांचा प्राधान्यक्रम याबाबत उच्चाधिकार समितीने छाननी करून १६ जुलै २०२५ रोजी पहिल्या टप्प्यातील १४३.९० कोटींच्या पुरातत्वीय कामांना मान्यता दिली. तसेच भूसंपादनाचे धोरण व कार्यपद्धती ठरविण्यासाठी नगर विकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. 

या भूसंपादन समितीचा अहवाल मिळाल्यानंतर उर्वरित कामांना उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता घेण्यात येईल. अंबाबाई आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाली असली तरी प्रशासकीय मान्यता अजून मिळाली नव्हती. प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय पुढे निधीची तरतूद व विकासकामांना सुरुवात होत नाही. अखेर गुरुवारी नियोजन विभागाने पहिल्या टप्प्यातील कामांना प्रशासकीय मान्यता दिली.

अध्यादेशातील तरतूदी..

  • आराखड्यातील कामांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी हे संनियंत्रण अधिकारी असतील.
  • प्रस्तावित कामे ३१ मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करावीत
  • पहिला टप्पा वगळता अन्य कामांचा समावेश यात असू नये
  • कामांची द्विरूक्ती होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • वास्तू जतन संवर्धनाची कामे पुरातत्व तसेच राज्य पुरातत्व विभागाकडून करून घ्यावी.


जिल्हास्तरीय तांत्रिक समिती

आराखड्यातील कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आराखड्याशी संबंधित विभागांच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश असलेली एक जिल्हास्तरीय तांत्रिक समिती गठित करण्यात येणार आहे. यात जिल्हा नियाेजन अधिकारी हे सदस्य सचिव असतील.

पहिल्या टप्प्यातील कामे

-श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा पहिला टप्पा साडेचारशे कोटींचा असला तरी सध्या त्यातील मंदिर व परिसर जतन संवर्धनाच्या १४३ कोटींच्या आराखड्याला मान्यता मिळाली आहे. यात मंदिराच्या दगडी बांधकामाचे सक्षमीकरण, जतन संवर्धन, सुटलेले दगड जोडणे, छताची गळती काढणे, शिल्पांचे मूळ स्वरूप खुलवणे व डागडूजी, मंदिर परिसरातील खासगी मंदिरांचेही जतन संवर्धन, दगडांवरील रंग काढून मूळ स्वरुपात आणणे ही कामे केली जातील.