शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
4
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
5
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
6
USA vs CAN : वर्ल्ड कपचा श्रीगणेशा! कॅनडा विरूद्ध अमेरिका म्हणजे IND vs PAK, जाणून घ्या कारण
7
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
8
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
9
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
10
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
11
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
12
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
13
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
14
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
15
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
16
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
17
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
18
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी
19
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
20
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर

बावडा पुलाचा भूसंपादन मोबदला देण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:23 AM

नवीन पुलासाठी कसबा बावडा आणि वडणगेकडील बाजूच्या गट नंबर १३ मधील ५५ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जेव्हा जमिनीचे भूसंपादन ...

नवीन पुलासाठी कसबा बावडा आणि वडणगेकडील बाजूच्या गट नंबर १३ मधील ५५ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जेव्हा जमिनीचे भूसंपादन झाले, तेव्हाच या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देणे गरजेचे होते. याबाबत शेतकऱ्यांनी अगोदर जमिनीचा मोबदला द्या आणि मगच पुलाचे काम सुरू करा, असा ठेका धरला होता. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष करत सार्वजनिक बांधकामने पुलाचे काम हाती घेतले. तब्बल चार वर्षांनंतरही शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत तातडीने बैठक घेऊन भूसंपादनाची रक्कम त्वरित देण्याचे आदेश काढले होते.

सध्या ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत, अशा शेतकऱ्यांचे जमिनी खरेदीबाबत रजिस्टर ऑफिसला सार्वजनिक बांधकाम विभाग व शेतकरी यांच्यात दस्त करण्यात येऊ लागले आहेत. रजिस्टर ऑफिसला कोरोनामुळे दररोज मर्यादित संख्येने दस्त केले जात असल्याने सर्व शेतकऱ्यांचे दस्त होण्यास दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांना कोरोना लस घेतल्याचा व कोरोनाची टेस्ट केल्याचा पुरावाही द्यावा लागत असल्याने या प्रक्रियेला काहीसा विलंब होत आहे.

चौकट : जमिनी रीतसर ताब्यात द्या

पुलाच्या ठेकेदाराने पुलाच्या दोन्ही बाजूकडील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी रीतसर आपल्या ताब्यात द्याव्यात, मगच आपण दोन्ही बाजूकडील कामास सुरुवात करू, अशा मागणीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. ठेकेदाराच्या ताब्यात जमिनी वेळेवर न दिल्यास काम बंद होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची आता शेतकऱ्यांबरोबर दस्त खरेदी करण्यासाठी घाई उडाली आहे.

सध्या या पुलाचा पाचवा स्लॅब येत्या १५ मेच्या आत टाकून पूर्ण करावयाचा आहे. त्यादृष्टीने ठेकेदाराची तयारी सुरू आहे. पाचवा स्लॅब पूर्ण झाल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूकडील कामास सुरुवात होणार आहे.

फोटो ०६ : कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ नवीन बांधण्यात येत असलेल्या पुलाचा पाचवा स्लॅब येत्या १५ मेपर्यंत टाकण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ठेकेदाराने तयारी सुरू ठेवली आहे.

(फोटो: रमेश पाटील, कसबा बावडा )