शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ग्रामीण भागात ३०० चौरस फुटांपर्यंतचे बांधकाम करा बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:32 AM

ग्रामीण भागातील बांधकामांना येणार गती लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामीण भागात ३०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना आता येथून पुढे ...

ग्रामीण भागातील बांधकामांना येणार गती

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ग्रामीण भागात ३०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना आता येथून पुढे कोणत्याही परवानगीची गरज राहणार नाही. नगर विकास खात्याने तशी अधिसूचना बुधवारी प्रसिद्धीस दिल्याने गेल्या दोन महिन्यांपासूनची प्रतीक्षाही संपली आहे.

ग्रामीण भागात बांधकाम करताना ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकारी कार्यालय स्थरावर बांधकाम परवाना दिला जात होता. तथापि, या निर्णयामुळे खूप वेळ जात होता. बांधकाम रखडत होते, शिवाय बेकायदेशीर बांधकामेही वाढत होती. या सर्व अडचणींमुळे ३०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना कोणत्याही अटी, शर्तींशिवाय परवाना काढण्याच्या कटकटीतून सुटका करावी अशी मागणी होत होती. याची दखल घेत डिसेंबरमध्ये नगर विकास विभागाने परवानगीची मर्यादा शिथिल केली होती. पण, त्याचे अंमलबजावणीचे आदेश काढले नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून गावपातळीवर मोठी संभ्रमावस्था होती. बुधवारी याबाबत नगर विकास विभागाचे उपसचिव लहुराज माळी यांनी रत्नागिरी वगळता सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून १५० व ३०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना कोणत्याही परवानगीची गरज राहणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील बांधकामांना आता चांगले दिवस येणार आहेत. नागरी भागालगतच्या बांधकामांना याचा चांगला फायदा होणार आहे.