शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पोषण आहार घोटाळा प्रकरणी फौजदारी दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 15:41 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार योजनेतर्गंत काम करणाऱ्या स्वयंपाकी, मदतनीस मानधन अपहाराची (घोटाळ्याची) रक्कम ...

कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार योजनेतर्गंत काम करणाऱ्या स्वयंपाकी, मदतनीस मानधन अपहाराची (घोटाळ्याची) रक्कम आपल्या वेगवेगळ्या १३ बँक खात्यावर २८ लाख ८९ हजार ३४० रुपये वर्ग करून घेणाऱ्या आठ जणांविरोधात प्रशासन फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे.

चौकशी समितीचे अध्यक्ष वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांना गुरुवारी अहवाल दिल्यानंतर घोटाळ्यातील दोषी आठ जणांविरोधात कारवाईकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर त्या आठ जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

शालेय पोषण आहाराचे लेखाधिकारी दीपक माने यांना १४ एप्रिल २०२४ रोजी इंद्रजित साठे यांच्यासह आठ जणांनी अपहरण केले. स्वयंपाकी, मदतनीस यांच्या मानधन निधीतील २३ लाख रकमेचा अपहार कबूल करण्यासाठी आणि त्यातील दहा लाखांच्या मागणीसाठी अपहरण झाल्याची पोलिसांत नोंद झाली. त्यानंतर पोषण आहार योजनेतील घोटाळा चव्हाट्यावर आला.

त्याची चौकशीसाठी स्थापन झालेल्या समितीने २०२१-२०२२ ते वर्ष २०२३-२०२४ या तीन वर्षांच्या कालावधीत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत काम करीत असलेल्या स्वयंपाकी, मदतनीस यांच्या मानधनाची मागणी आणि प्रत्यक्ष पैसे दिलेल्यांची पडताळणी केली. पडताळणीत ८ व्यक्तींच्या १३ वेगवेगळ्या बँक खात्यावरून २८ लाख ८९ हजार ३४० इतकी रक्कम शासकीय योजनेतून परस्पर वर्ग केल्याचे आढळून आले.

परिणामी, घोटाळ्यात ८ जणांचा थेट सहभाग असल्याचे पुढे आले आहे. अहवाल सादर होताक्षणी या आठ जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल झालेच पाहिजे, इतके हे गंभीर प्रकरण आहे; पण सीईओ कार्तिकेयन यांच्याकडे अहवाल सादर होऊन दुसरा दिवस उलटला तरी अजून फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, शुक्रवारी फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधीच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत.

कारवाईसाठी वरिष्ठांकडे अहवाल

घोटाळ्यात कंत्राटी कर्मचारी तेजस्विनी साठे यांना प्रकरण उघड झाल्यानंतर कार्यमुक्त केले आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा लेखाधिकारी माने यांनाही शालेय पोषण आहार लेखाधिकारी पदावरून कार्यमुक्त केले. माने वर्ग दोनचे अधिकारी आहेत. त्यांच्यावर कारवाईचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

दोघेही कार्यमुक्त, घोटाळ्यातील रक्कम वसूल कशी करणार ?

शालेय पोषण आहारचे प्रमुख प्रशासकीय काम करणारे माने आणि साठे सध्या दोघेही कार्यमुक्त आहेत. यामुळे अपहाराची २८ लाखांवरील रक्कम वसूल करणे आव्हानात्मक आहे. यासाठी प्रशासन काय भूमिका घेणार यासंबंधीची उत्सुकता लागून राहिली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद