शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
3
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? सीबीआयनं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
4
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
5
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
7
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
8
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
9
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
10
घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
11
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
12
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
13
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
14
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
15
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
16
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
17
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
18
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
19
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
20
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
Daily Top 2Weekly Top 5

"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 12:00 IST

"नव्या करारासाठी लवकरात लवकर चर्चा सुरू व्हायला हवी. जोपर्यंत नवीन करार होत नाही, तोपर्यंत जुनाच करार लागू ठेवावा आणि भविष्यातील पाणीवाटप कराराला कोणत्याही ठराविक कालमर्यादा नसावी," असे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी म्हटले आहे. 


भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा एक कळीचा मुद्दा बनताना दिसत आहे. "भारतासोबतच्या चांगल्या संबंधांचे भविष्य आता गंगा पाणी करारावर अवलंबून असेल," असे बांगलादेशातील सत्ताधारी पक्ष 'बीएनपी'चे (BNP) सरचिटणीस तथा ग्रामीण विकास मंत्री मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी म्हटले आहे. ते ढाका येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. 

मिर्झा फखरुल इस्लाम यांचे म्हणणे काय? -
ही ३० वर्षे जुनी 'गंगा वॉटर शेअरिंग ट्रीटी' (Farakka Treaty) डिसेंबर २०२६ मध्ये संपुष्टात येत आहे. मात्र, आता हा करार बांगलादेशची "अपेक्षा आणि गरजांनुसार" नवीन स्वरूपात तयार केला जावा, असेही मिर्झा यांचे म्हणणे आहे. "नव्या करारासाठी लवकरात लवकर चर्चा सुरू व्हायला हवी. जोपर्यंत नवीन करार होत नाही, तोपर्यंत जुनाच करार लागू ठेवावा आणि भविष्यातील पाणीवाटप कराराला कोणत्याही ठराविक कालमर्यादा नसावी, असे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी म्हटले आहे. 

'गंगा नदी' बांगलादेशात 'पद्मा नदी' म्हणून ओळखली जाते - 
भारतातून बांगलादेशात प्रवेश केल्यानंतर, गंगा नदीला 'पद्मा' नदी म्हणून ओळखले जाते. बांगलादेशच्या दृष्टीने, शेती, पिण्याचे पाणी आणि पर्यावरणासाठी ही नदी अत्यंत महत्त्वाची आहे. फरक्का बैराजमुळे उन्हाळ्यात पाण्याचा प्रवाह कमी होतो. यामुळे आता तेथील शेती आणि पर्यावरणाचे नुकसान होते, असा बांगलादेशचा दावा आहे.

पद्मा नदीवर बॅरेजला मंजुरी -
फरक्का बॅरेजचा "नकारात्मक प्रभाव" कमी करण्यासाठी बांगलादेश सरकारने पद्मा नदीवर एका मोठ्या बॅरेज प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प २०३३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, यामुळे नदीत गाळ साचण्याची समस्या वाढू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तत्पूरर्वी, बीएनपी नेत्यांनी तीस्ता जल करारावरून पश्चिम बंगालच्या राजकारणावर निशाणा साधत, ममता बॅनर्जी यांच्या सरकारमुळे हा करार रेंगाळल्याचा आरोप केला होता; तसेच तिथे भाजपच्या विजयाचे स्वागत करत तीस्ता चर्चा पुढे जाण्याची आशा व्यक्त केली होती.

भारताची स्पष्ट भूमिका -
या विषयावर बोलताना, "दोन्ही देशांमध्ये जलविवाद सोडवण्यासाठी अनेक द्विपक्षीय यंत्रणा आधीपासूनच कार्यरत आहेत. भारत आणि बांगलादेश ५४ सामायिक नद्यांशी संबंधित मुद्द्यांवर सातत्याने चर्चा करत असतात, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, बांगलादेश सरकारने गंगा कराराला थेट संबंधांशी जोडल्याने आगामी काळात पाण्याचे राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh demands Ganga water; India responds firmly on Farakka treaty.

Web Summary : Bangladesh seeks renewal of the Ganga water treaty, linking it to relations with India. India emphasizes ongoing discussions through existing bilateral mechanisms on shared river issues, highlighting continued dialogue.
टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतWaterपाणीPoliticsराजकारण