शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
3
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
4
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
5
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
6
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
7
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
8
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
9
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
10
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
11
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
12
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
13
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
14
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
15
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
16
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
17
'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
18
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
19
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
20
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 10:47 IST

MPSC आणि शासकीय भरती प्रक्रियेत महाराष्ट्राचा मोठा कायापालट. ११०० कालबाह्य नियम बदलले, २३० पदे रद्द तर 'बकेट सिस्टीम'मुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार. वाचा सविस्तर.

- व्ही. राधा
अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग

माझा मुलगा त्याच्या जेवणाच्या ताटाकडे पाहत बसला होता. त्याच्या खोलीच्या भिंती एका शांत आत्मक्लेशाची कहाणी सांगत होत्या. मूक साक्षीदारांसारखे त्या भिंतींवर लावलेले नकाशे, लष्करी शिस्तीत आखलेली वेळापत्रके, त्याच्या लॅपटॉपवर सतत सुरू असलेले लेक्चर... अशा गोष्टींनी त्याला घेरून ठेवले होते, कारण तो देशातील सर्वात कठीण नागरी परीक्षांपैकी एका परीक्षेची तयारी करत होता. त्या क्षणात आम्हाला फक्त नागरी सेवा देणारा एक उमेदवार दिसला नाही तर दिसली एक अस्वस्थता आणि वेदना! जी दिसते, पुण्यातील सदाशिव पेठेतील कोचिंगच्या गल्लीबोळांत, दिल्लीतील मुखर्जी नगरमधील अरुंद पेईंग गेस्ट खोल्यांमध्ये आणि शांत घरांमध्ये जिथे आई-वडील स्वतःच्या घरातही पाऊल न वाजवता चालतात. कारण भांड्यांचा आवाजही मुलाच्या एकाग्रतेला तडा देईल, अशी भीती त्यांना सतत वाटत राहते. परीक्षांचा ताण हा एक सार्वत्रिक मानवी अनुभव आहे. पण भारतात उमेदवारांचे कंबरडे मोडून काढतो तो कठीण अभ्यासक्रम नाही तर ती परीक्षांची व्यवस्था. उशिरा होणाऱ्या परीक्षा, बदलणारे वेळापत्रक, भरती प्रक्रियेला अडथळा आणणारे न्यायालयीन स्थगिती आदेश, प्रश्नपत्रिका फुटणे, प्रशासनाच्या ढिलाईमुळे नकळत वयोमर्यादा संपुष्टात येणे अशा समस्या हा ताण वाढवितात.
जेव्हा महाराष्ट्राच्या शासकीय सेवाभरती व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली, तेव्हा समस्या फक्त या व्यवस्थेतील संथपणा व अपारदर्शकता एवढीच नाही तर सेवाप्रवेशाचे नियमही कालबाह्य झाल्याचे लक्षात आले. संबंधित ३३ वेगवेगळ्या विभागांतून प्राप्त ११०० हून अधिक भरती नियम पाहिले असता त्यातील काही तर १९६० च्या दशकात लिहिले गेले होते. असे कालबाह्य नियम आत्ताच्या सेवाप्रवेशाचे नियम व निकष ठरवत होते. भविष्यासाठी सुसज्ज आधुनिक राज्यासाठी विशिष्ट कौशल्यप्राप्त, डिजिटल साधनांची जाण असलेली आणि आज अस्तित्वात असलेल्या ज्ञानशाखांमध्ये प्रशिक्षित व्यक्तीची नियुक्ती करणे क्रमप्राप्त होते. गतकाळातील प्रशासनासाठी बनविलेले नियम भविष्यवेधी राज्याच्या गरजा भागवू शकतील ही अपेक्षा कशी फलद्रुप ठरणार? म्हणून एक अशक्यप्राय काम आम्ही हाती घेतले. अनेक वर्षे कुणालाही जे होण्यासारखे वाटले नव्हते असे काम. प्रत्यक्ष बसून ते सर्व हजाराहून जास्त नियम आम्ही वाचले. एकही नियम आमच्या नजरेतून सुटला नाही. ते अतिशय किचकट, कंटाळवाणे काम होते. पात्रतेच्या अटी, संवर्ग वर्गीकरणांची पानामागून पाने, पिवळट पडलेल्या कागदांवर टाइप केलेली, तर काही इतक्या जुन्या भाषेत की, नेमके कोणत्या पदाचे वर्णन आहे हे समजायलाच वेळ लागे. 

‘निपुण सेतू’ मोलाचे पाऊल 
उपयुक्तता संपलेल्या २३० हून अधिक पदांचा पुनर्विचार करण्यात आला. अराजपत्रित पदांसाठीच्या मुलाखती पूर्णपणे रद्द करून मानवी हस्तक्षेप कमी करण्यात आला. पारदर्शकता आणि गती या दोन गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून भरती प्रक्रियेला नव्याने आकार देण्यात आला. कालसंगत बदल केले.  
‘निपुण सेतू’ हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरले. अगदी थोड्याशा गुणांमुळे संधी हुकलेल्या तरुण उमेदवारांना गुणवत्तायादीत स्थान देऊन सार्वजनिक संस्था, महामंडळे आणि खासगी आस्थापनांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.
या सुधारणांचे खरे यश पुढील काळात दिसेल. आज नकाशे, वेळापत्रकांनी भरलेल्या खोल्यांमध्ये बसलेले तरुण उद्या राज्याच्या विविध भागांत नागरिकांची सेवा करताना दिसतील. महाराष्ट्रातील युवकांना चमत्कार नको आहे; त्यांना हवी आहे न्याय्य, पारदर्शक आणि कालबद्ध व्यवस्था. योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य व्यक्तीची भरती करणारे राज्यच खऱ्या अर्थाने सक्षम प्रशासन उभारू शकते. महाराष्ट्राने त्या दिशेने पावले टाकली आहेत.  आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हे व्रत पुढे नेत भविष्याची वाट सुकर केली पाहिजे.

अशी जन्माला आली बकेट सीस्टिम 
आधीच कामाच्या बोझ्याखाली असलेल्या प्रशासनाकडून जवळपास तीनशेच्या आसपास चर्चा-सल्लामसलती बैठकांची अपेक्षा करणे ही छोटी गोष्ट नव्हती. पण कोणत्याही विभागाने विरोध केला नाही. शासनाच्या कार्यक्षमतेसाठी आणि त्या तरुणासाठी जो या क्षणी भाड्याच्या अरुंद खोलीत टेबलावर नोट्स पसरवून नागरी सेवेत येऊन आयुष्य आणि समाज घडवण्याचं स्वप्न उराशी कवटाळून बसला आहे.
यातूनच जन्माला आली बकेट सीस्टिम. ही कल्पना तशी साधी सोपी होती. समान प्रकारचे काम करणाऱ्या आणि समान पात्रता आवश्यक असलेल्या संवर्गांना एकत्र करून समान परीक्षा गट तयार करणे यातून १४०० प्रक्रिया कमी होऊन ४७ वर आल्या. राज्य सेवा संवर्ग ३५ पदावरुन वरून ६१ पर्यंत वाढवण्यात आले. कायदा, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अशा १८ नवीन संयुक्त सेवा तयार करण्यात आल्या. याच्या मुळाशी एकच विचार होता की, १५ पदांची भरती करण्यासाठी १५ वेगवेगळ्या परीक्षा का घ्यायच्या?

टॅग्स :jobनोकरी