PM Modi: १७ वर्षांनंतर बीएनपी सत्तेत; पंतप्रधान मोदींकडून तारिक रहमान यांच्यासाठी खास ट्वीट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:50 IST2026-02-13T09:49:04+5:302026-02-13T09:50:55+5:30
PM Modi Congratulates Tarique Rahman: बांगलादेशातील १३ व्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने ऐतिहासिक विजय मिळवत सत्तेत पुनरागमन केले आहे. या मोठ्या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएनपीचे नेते तारिक रहमान यांच्यासाठी खास ट्वीट केले आहे.

PM Modi: १७ वर्षांनंतर बीएनपी सत्तेत; पंतप्रधान मोदींकडून तारिक रहमान यांच्यासाठी खास ट्वीट!
शेख हसीना यांच्या सत्तेतून हकालपट्टीनंतर बांगलादेशात झालेल्या १३ व्या ऐतिहासिक संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएनपीचे नेते तारिक रहमान यांचे मनापासून अभिनंदन केले असून, दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे तारिक रहमान यांचे अभिनंदन करताना त्यांनी म्हटले आहे की,"संसदीय निवडणुकीत बीएनपीला मिळालेला निर्णायक विजय हा बांगलादेशच्या जनतेचा तुमच्या नेतृत्वावरील अढळ विश्वासाचे प्रतीक आहे. या यशाबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो." पंतप्रधानांनी पुढे स्पष्ट केले की, भारत एका लोकशाहीवादी, प्रगतीशील आणि समावेशक बांगलादेशच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. उभय देशांमधील सामायिक विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि प्रादेशिक शांततेसाठी भारत नवीन सरकारसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
I convey my warm congratulations to Mr. Tarique Rahman on leading BNP to a decisive victory in the Parliamentary elections in Bangladesh.
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
This victory shows the trust of the people of Bangladesh in your leadership.
India will continue to stand in support of a democratic,…
१७ वर्षांच्या निर्वासनानंतर सत्तेत पुनरागमन
तारिक रहमान आणि त्यांच्या बीएनपी पक्षासाठी हा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तब्बल १७ वर्षांच्या राजकीय निर्वासनानंतर तारिक रहमान यांच्या पक्षाने मिळवलेली सत्ता ही दक्षिण आशियाई राजकारणातील एक मोठी उलथापालथ मानली जात आहे. शेख हसीना यांच्या सरकारनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत झालेली ही पहिलीच मोठी निवडणूक होती, ज्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
भारत-बांगलादेश संबंधांचे नवीन वळण
पंतप्रधान मोदींच्या या अभिनंदन संदेशाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. भारताने स्पष्ट संकेत दिले आहेत की, बांगलादेशातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर भारत नवीन सरकारसोबत मजबूत आणि स्थिर द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करण्यास प्राधान्य देईल. व्यापार, सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांत दोन्ही देश पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.