शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर मुद्दा पुन्हा पेटणार! पाकिस्तानच्या नापाक हरकती रोखण्यासाठी भारत झाला सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 10:45 IST

जर पाकिस्तानने आपल्या नापाक हरकती कमी केल्या नाही तर भारत पाकिस्तानला रोखठोक उत्तर देण्यास समर्थ आहे.

नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्र अधिवेशनात पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. संयुक्त राष्ट्र अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना दहशतवाद हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला येणार आहे. तसेच पाकिस्तानकडून काश्मीर मुद्दा उचलला जाऊ शकतो त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने तयारी केली आहे. त्यामुळे जर संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानने काश्मीर मुद्दा काढला तर भारताकडून त्याला रोखठोक उत्तर दिलं जाणार आहे. 

भारताचे प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र अधिवेशनाचा वापर पाकिस्तानकडून काश्मीर मुद्दा उचलण्यासाठी केला जाऊ शकतो. जर पाकिस्तानने आपल्या नापाक हरकती कमी केल्या नाही तर भारत पाकिस्तानला रोखठोक उत्तर देण्यास समर्थ आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर भारताकडे तयार आहे. 

भारत पाकिस्तानच्या रणनीतीला आपल्या पद्धतीने उत्तर देईल. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मामला आहे. त्यामुळे कलम 370 रद्द करणे आणि जम्मू काश्मीरचं विभाजन करणे हा भारत सरकारचा निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कसा येऊ शकतो? काही देश अशाप्रकारे स्वत:ची प्रतिमा खालवण्याचं काम करत आहेत. मात्र आम्ही आमची प्रतिमा उंचावत आहोत असा टोला सैय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला लगावला आहे. तसेच यूएनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यात इंटरनेट आणि सायबर यामाध्यमातून कशाप्रकारे दहशतवाद पसरविला जातो आणि त्याला कसं रोखलं जाऊ शकतं यावर चर्चा होईल. भारताने नेहमी दहशतवादाला आव्हान दिलं आहे असा विश्वास अकबरुद्दीन यांनी दिला. 

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्दा संयुक्त राष्ट्र अधिवेशनात उचलणार असल्याचे संकेत दिले आहेत. 27 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिवेशनात भाषण आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान वारंवार भारताच्या विरोधात षडयंत्र रचत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला नेहमी तोंडघशी पडावं लागलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्र अधिवेशनात पाकिस्तान काश्मीर मुद्दा उचलणार असल्याचं सांगितले आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीर