शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रात्री १० नंतर शहरातील चौकांतून पोलीस गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:40 IST

रिॲलिटी चेक लोगो वापरावा.. हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रात्रीला संचारबंदी लागू केली आहे. रात्री ७ वाजेपूर्वी काही मिनिटे ...

रिॲलिटी चेक लोगो वापरावा..

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रात्रीला संचारबंदी लागू केली आहे. रात्री ७ वाजेपूर्वी काही मिनिटे अगोदर पोलिसांची गाडी हिंगोली शहरातून सूचना देत फिरत असली तरी रात्री १० वाजेनंतर शहरातील एकाही चौकात पोलीस थांबत नसल्याचे चित्र २५ फेब्रुवारी रोजी केलेल्या पाहणीत आढळून आले.

जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आठवडाभरात दोन रूग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ५ झाली आहे. सध्या १७१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दररोज आढळणाऱ्या कोरोनाच्या रूग्ण संख्येमुळे जिल्ह्यात रात्रीला संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. २४ फेब्रुवारीपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली. पहिल्या दिवशी पोलिसांनी पुढाकार घेतल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र दुसऱ्या दिवशी रात्री ७ वाजेनंतरही काही वेळ नागरिक रस्त्यावर फिरत होते. २५ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजेदरम्यान पोलिसांची गाडी शहरातून गस्त घालत होती. मात्र त्यानंतर पोलिसांची गाडीही गायब झाली होती अन् चौकातील पोलीस ही. गुरूवारी रात्री १० ते ११ वाजेदरम्यान शहरातील तलाब कट्टा चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भगवान महावीर चौक, महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, नांदेड नाका चौक, जुनी जि. प. इमारत चौक, अकोला बायपास, आखरे मेडिकल चौक, जवाहर रोड भागात एकही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. काही भागात दुचाकी मात्र धावत असताना दिसून येत होत्या. तर एका चौकात नागरिक उभे होते.

नांदेड नाका चौक

शहरातील नांदेड नाका चौक परिसराच्या बाजूला तीन ते चार नागरिक बोलत उभे होते. चौकातून जाणारी वाहने वगळता शुकशुकाट जाणवत होता.

इंदिरा गांधी चौक

हिंगोली शहरातील इंदिरा गांधी चौक परिसरात एकही पोलीस नव्हता. तर अधून-मधून दुचाकी वाहने धावत होती.

भगवान महावीर चौक

हिंगोली शहरातील भगवान महावीर चौक परिसरात पाहणी केली असता यावेळी एकही पोलीस आढळून आला नाही. चौक निर्मनुष्य दिसत होता.

महात्मा गांधी चौक

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक परिसरातही एकाही पोलीस कर्मचारी नियुक्त नव्हता. यावेळी एका रस्त्यावर काही नागरिक गप्पा मारताना दिसत होते.

दोन जणांवर गुन्हे दाखल

१) जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा, परवानगी घेतलेल्या व्यक्ती वगळता रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

२) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मागील दोन दिवसांत हिंगोली शहरातील एका मंगल कार्यालय मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला आहे.

३) शहरातील बहुतांश नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असले तरी अद्याप ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

प्रतिक्रिया