शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
4
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
5
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
6
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
7
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
8
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
9
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
10
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
13
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
14
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
15
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
16
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
17
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
18
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
19
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
20
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

ॐ नमः शिवाय- ओमच्या जपाने होणारे फायदे वाचाल तर लगेच म्हणायला सुरूवात कराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 12:27 IST

जेव्हा तुम्ही मंत्राचा जप करत असता. त्यावेळी डोक्यातून राग, भिती अशा भावना दूर होत जातात. मनातून नकारात्मक विचार निघून जातात.

अनेक लोक ओम या मंत्राचा जप करत असतात.  मनाला शांती वाटावी म्हणून तर काहीजण देवाची प्रार्थना करत असताना ओम नामाचा  जप करत असतात. ओम नामाचा जप करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण ओम नामाचा जम जर तुम्ही योग्यप्रकारे केलात तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात. एका अभ्यासानुसार जे लोक योग्य पध्दतीने ओमचा जप करतात. ते लोक खूप ताण-तणावमुक्त असल्यासारखं फील करतात. चला तर मग जाणून घेऊया ओम म्हटल्याने शरीराला कोणते फायदे होतात. 

अनेक लोक दिवसभर देवाला वंदन करण्यासाठी किंवा देवाप्रती भक्ती व्यक्त करण्यासाठी ओम नमः शिवायचा जप करतात. पण हा जप करत असताना फक्त देवाची भक्तीच नाही तर तुम्ही तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवू शकता. 

ओम चा उच्चार या ठिकाणी करा

या मंत्राचा उच्चार गर्दीच्या ठिकाणी करू नका. कमी गर्दीच्या ठिकाणी शांत आणि अल्ल्हाददायक ठिकाणी करा. एकाग्रतेने करा. आजूबाजूच्या वातावरणाने लक्ष विचलित होऊ न देता. या नावाचा जप करावा. 

मनाला शांती मिळते

(image credit- mindfull.org)

योगा आणि मेडिटेशन गुरूंच्या म्हणण्यानुसार ओमचा जप केल्यानंतर आजूबाजूला सकारात्मक भावना निर्माण होत असतात. यामुळे तुम्ही नकारात्मक  विचार करण टाळता. त्यामुळे तन-मन आणि आत्म्याला शांती मिळते.

पचनशक्ती मजबूत होते

ओम नावाचा जप केल्यामुळे पोटाचे विकार दूर होतात. आरोग्य उत्तम राहतं. पचनक्रिया चांगली राहते.  ज्या लोकांना रात्री झोप न येण्याचा त्रास उद्भवतो. त्यांनी सकाळी ओमचा मंत्र म्हटल्यानंतर  त्रास दूर होईल.

ताण-तणावमुक्त राहता येतं.

(image credit- indiatv.com)

जेव्हा तुम्ही मंत्राचा जप करत असता. त्यावेळी डोक्यातून राग, भिती अशा भावना दूर होत जातात. मनातून नकारात्मक विचार निघून जातात. शारीरिक आणि मानसिक आरोग्य निट राहण्यासाठी हा ओमच्या मंत्राचा जप फायदेशीर ठरत असतो.  सकाळी लवकर उठून जप केल्याने दिवस चांगला जातो. सकाळी शक्य नसल्यास रात्री जप करा.

एकाग्रता वाढते

(image credit-theweek)

ओम नामाचा जप केल्यास मानसिक तणावातून मुक्ती मिळते आणि मन शांत राहत असल्याचं विज्ञानानं देखील मान्य केलंय. एकाग्रता अधिक राहते . तसंच ओम शब्द हा कधीही हळू आवाजात बोलू नये. हळू आवाजात जप केल्यास त्याचा काही फायदा होत नाही. जितक्या जोरात या शब्दाचा उच्चार आणि जप केल्यास तितकाच लाभ होतो आणि शांतीही मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य