शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांपासून भेंडाळातील पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:37 IST

भेंडाळा : चामाेर्शी पंचायत समितीअंतर्गत भेंडाळा येथील नळ पाणीपुरवठा याेजनेच्या माेटारमध्ये बिघाड निर्माण झाल्याने गेल्या १० दिवसांपासून गावात नळ ...

भेंडाळा : चामाेर्शी पंचायत समितीअंतर्गत भेंडाळा येथील नळ पाणीपुरवठा याेजनेच्या माेटारमध्ये बिघाड निर्माण झाल्याने गेल्या १० दिवसांपासून गावात नळ पाणीपुरवठा पूर्णत: ठप्प आहे. परिणामी गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ याेजनेची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयावर घागर माेर्चा काढणार, असा इशारा महिलांनी दिला आहे.

वाघोली येथील नदी घाटावरील इन्वेल टाकीवर बसवलेली मोटार वर आली आणि पाणी तळाशी गेले. त्यामुळे भेंडाळा गावाला पाणीपुरवठा बंद आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीवर महिलांचा घागर मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा या गावाची लोकसंख्या जवळपास तीन हजार आहे. भेंडाळा गावापासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ३५ ते ४० वर्षांपूर्वी गावालगत एका शेतात विहीर खोदून ५० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा नळयोजना कार्यान्वित करण्यात आली होती. कालांतराने गावातील वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन साधारणतः सहा ते सात वर्षांपूर्वी वाघोली येथील वैनगंगा नदीवर दुसरी वाढीव पाणीपुरवठा योजना ४० हजार लीटर क्षमतेची सुरू करण्यात आली. त्यामुळे एकंदरीत ९० हजार लीटर क्षमतेच्या दोन नळयोजनांच्या टाक्या अस्तित्वात असूनदेखील गावांतील लोक ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर तहानलेलेच असल्याचे चित्र दिसत आहे. वाघोली येथील नदी घाटावर भेंडाळा पाणीपुरवठा योजनेची इन्वेल टाकी तयार केली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून टाकीवर असलेली मोटार वर आली व टाकीतील पाणी तळाशी गेल्यामुळे पाइपद्वारे पुरेशा प्रमाणात पाणी बाहेर निघू शकत नाही. त्यामुळे भेंडाळा येथील पाणीपुरवठा मागील काही महिन्यांपासून दहा दिवसांआड पाणी गावकऱ्यांना मिळत आहे. कधी-कधी दहा दिवसांनंतरही पाणी मिळत नाही. अशी स्थिती भेंडाळा गावाची झाली आहे. या गावामध्ये घरोघरी नळ योजना असूनही नागरिकांना पाणी मिळत नाही. या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावाला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी ठोस अशा उपाययोजनेची आवश्यकता आहे. परंतु ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आराेप ग्रामस्थांकडून हाेत आहे. गावात कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यास ग्रामपंचायत प्रशासन उदासीन दिसत आहे. या गावात पाण्याची समस्या गेल्या ५० वर्षांपासून सुटलेली नाही. तरी या परिसरातल्या लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. येत्या आठवडाभरात गावातील नळ पाणीपुरवठ्याची समस्या मार्गी न लागल्यास ग्रामपंचायत भेंडाळा व पंचायत समिती चामाेर्शी पं.स. कार्यालयावर महिलांचा घागर माेर्चा काढूू, असा इशारा पं.स. सदस्य धर्मशीला सहारे यांनी दिला आहे.