शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

४१० ग्रा.पं.चा आराखडा तयार

By admin | Updated: June 24, 2016 01:53 IST

वर्षातील नेमक्या कोणत्या हंगामात कामाची गरज आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी नेमके कोणत्या प्रकारचे काम करणे आवश्यक आहे.

प्रत्येक कुटुंबाची माहिती : वर्षभरातील रोहयो कामांचे नियोजन; मागणीनुसार मिळणार कामगडचिरोली : वर्षातील नेमक्या कोणत्या हंगामात कामाची गरज आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी नेमके कोणत्या प्रकारचे काम करणे आवश्यक आहे. कोणत्या कामाला प्रथम प्राधान्य देण्यात यावे, याबाबतचा २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा विकास आराखडा जिल्हाभरातील ४१० ग्रामपंचायतींनी तयार केला आहे. ग्रामसभेने त्याला मंजुरी प्रदान केली आहे. २०१६-१७ या वर्षातील रोहयोची कामे याच आराखड्यानुसार करण्याचे बंधन ग्रामपंचायतीवर व संबंधित यंत्रणेवर राहणार आहे. त्यामुळे या आराखड्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. मागील सात वर्षांपासून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र नागरिकांची कामाची मागणी व प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत असलेले काम याबाबत ताळमेळ जोडत नसल्याने काम आहे तेव्हा मजूर मिळत नाही व मजूर रिकामे आहेत. रोहयोचे काम राहत नाही, अशी विपरित परिस्थिती निर्माण होत होती. त्यामुळे नागरिकांना रोजगार मिळण्यास अडचण निर्माण होत होती. ही समस्या सोडविण्यासाठी शासनाने प्रत्येक गावाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरूवात झाली.ग्रामसेवक, रोहयो विभागाचे तांत्रिक अधिकारी, वन विभाग, सिंचाई विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी गावाचा परिसर फिरून गावाच्या सभोवतालची माहिती जाणून घेतली. प्रत्यक्ष कामाच्या जागेला भेट दिली. त्याबद्दल नागरिकांशी संवाद साधून कामांची यादी तयार केली. या यादीला ग्रामसभेने मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे या कामांची यादी अंतिम मानली जात आहे. जिल्ह्यातील सुमारे ४१० ग्रामपंचायतीनी विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर आता नागरिकांच्या मागणीनुसार रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात याच आराखड्यानुसार काम होणार आहे. त्यामुळे कामांची मागणी व उपलब्धता यामध्ये ताळमेळ जोडला जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)ज्या मजुरांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात ९० दिवसांपेक्षा अधिक रोहयो काम केले आहे. अशा रोहयो मजुरांना त्यांच्या आवडीप्रमाणे स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. प्रशिक्षणानंतर त्याला रोजगार करता यावा यासाठी बँकेकडून कर्ज मिळावे, यासाठीही मदत केली जाणार आहे. रोहयोचा मजूर पुढे चालून रोहयोच्याच कामावर अवलंबून राहता, त्याने स्वत:चा रोजगार करावा व इतरांनाही त्याने रोजगार द्यावा, ही अपेक्षा यामागे आहे.