प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य संचालकांचे पथक पोहोचल्याने या भागातील आदिवासींमध्ये हे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य संचालकांच्या पथकाने ह्या भागात दौरा करून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ...
लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच नक्षलवद्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे. ...
बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र उन्हाळ्यात अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसतो. विशेषत: दुर्गम व ग्रामीण भागांना याचा सर्वाधिक फटका बसत आलेला आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असतात. ...
गडचिराेली जिल्हास्तरावर दाेन शासकीय रुग्णालये आहेत. तीन ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये, तर नऊ ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. याशिवाय ग्रामीण भागात प्राथमिक आराेग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. या रुग्णालयांमध्ये राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ ...
बऱ्याच सोयी, सवलती व योजना थेट गरजूंपर्यंत पोहोचावे यासाठी आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. नागरिकांनी सुद्धा आपापल्या स्तरावरून जनजागृती करून लाभ घेतला पाहिजे, असे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी यावेळी म्हणाले. आमदार धर्मराव बाबा आत्राम या ...
नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नळाद्वारे शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास सात जलकुंभ उभारण्यात आले आहेत. दाेन ठिकाणी नवीन जलकुंभ झाले आहेत. वाॅर्डावाॅर्डांत पाईपलाईन टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाताे. वैनगंगा नदीवरील बाेरमाळा घाटावर पालिका प्रशास ...
सर्वसाधारण बसमध्ये जवळपास ४४ सीट राहतात. त्यापैकी काही सीट दिव्यांग, महिला, आमदार, कर्तव्यावर जाणारे कर्मचारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, पत्रकार यांच्यासाठी काही सीट राखीव राहतात. त्यापैकी आमदार अपवादानेच बसमध्ये बसतात. मात्र, दिव्यांग व महिलावर्ग म ...
कुठलेही वाद हे विनाकारण होत नसतात तर त्यामागे काही ना काही कारण असतेच. वादावरून वाद वाढत गेल्याने फिर्यादीसह आरोपीलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागण्यासोबतच अमूल्य वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठी व नि ...
पावसाळा जवळ येत असल्याने शेतकऱ्यांनी आता बियाणांचा शाेध घेण्यास सुरुवात केली आहे. खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचा दर्जा चांगला राहत असला तरी हे बियाणे तीनपट महाग राहते. एका एकरासाठी जवळपास एक हजार रुपयांची बॅग खरेदी करावी लागते. दहा एकर शेती असेल तर ब ...