शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंत्योदय कार्डावरील सदस्य प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यात वर्ग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:01 IST

केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी अन्न योजनेपैैकी अंत्योदय योजना ही महत्त्वाची योजना आहे. ज्या नागरिकांना कोणतेही काम करणे जमत नाही, अथवा पीडित आहेत, तसेच अती गरीब कुटुंब याशिवाय पीडित व्यक्ती, अंध, अपंग व्यक्ती, विधवा महिला यांच्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची ही योजना आहे.

ठळक मुद्देलहान कुटुंबाला दरमहा ३५ किलो धान्याऐवजी प्रती व्यक्ती पाच किलोनुसार मिळणार धान्य; जिल्हाभरात ३१ हजार लाभार्थी

विलास चिलबुले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकेवरील सदस्य प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये वर्ग करण्याच्या हालचाली शासनस्तरावरून सुरू झाल्या असून या संदर्भातील कार्यवाही प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक राशनकार्डधारकांकडून अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या व एका कार्डावर एक किंवा दोन व्यक्ती असलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा लहान कुटुंबांना दरमहा ३५ किलो धान्याऐवजी प्रती व्यक्ती ५ किलोनुसार धान्य मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी अन्न योजनेपैैकी अंत्योदय योजना ही महत्त्वाची योजना आहे. ज्या नागरिकांना कोणतेही काम करणे जमत नाही, अथवा पीडित आहेत, तसेच अती गरीब कुटुंब याशिवाय पीडित व्यक्ती, अंध, अपंग व्यक्ती, विधवा महिला यांच्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची ही योजना आहे. या योजनेत समाविष्ट असलेले व कार्डावर एक ते दोनच व्यक्तींचा नाव असलेले गडचिरोली जिल्ह्यात ३१ हजार लाभार्थी असून संपूर्ण महाराष्टÑात ८१ हजार ८९७ इतके लाभार्थी आहेत. आता सरकारने सदर अंत्योदय योजनेचे नवे नामकरण केले आहे. पंडित दीनदयाल अंत्योदय योजना अशी नवी योजना म्हणून ओळखली जात आहे. मात्र या योजनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे. एक किंवा दोन व्यक्ती असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेतून वर्ग करून प्राधान्य लाभार्थी कुटुंब योजनेत समाविष्ट करण्यात येणार असल्याने अशा कुटुंबावर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्यभरात अंत्योदय अन्न योजनेत एकूण २४ लाख ५५ हजार ९१४ लाभार्थी आहेत. यात एक व दोन व्यक्तींचा समावेश असलेल्या राशनकार्डधारकांची ६ लाख ८१ हजार ८९७ इतकी आहे. अल्प सदस्य संख्या असलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंब योजनेत वर्ग करण्यात येणार आहे.
एक किंवा दोन व्यक्ती हे अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहेत. यामध्ये अंध, अपंग, विधवा महिला, दीर्घ आजारी व्यक्ती, पीडित व्यक्ती, अत्यंत गरीब व्यक्ती, निराधार, एचआयव्हीग्रस्त व्यक्ती, वयोवृद्ध, पती-पत्नी आदींचा समावेश आहे. मात्र शासन आता अशा व्यक्तींना अंत्योदय योजनेतून प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट करणार आहे. त्यामुळे त्यांची मोठी अडचण होणार आहे. त्याअनुषंगाने पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानदारांकडून एक व दोन व्यक्ती असलेल्या लाभार्थ्यांची नावानिशी यादी मागविली आहे. वर्ग करण्याची ही प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी जिल्ह्यात होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून दुष्काळी परिस्थितीत स्वस्त धान्यावर मदार असते.

महिनाभराचा प्रपंच कसा होणार?
गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल व मागास जिल्हा आहे. केंद्र सरकारच्या सदर अंत्योदय योजनेच्या बदलाचा फटका गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ३१ हजार २६ लाभार्थ्यांना बसणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे एकूण २ लाख १८ हजार ५३७ लाभार्थी आहेत. यामध्ये एक व दोन व्यक्तींचा समावेश असलेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या ३१ हजार २६ आहे. या कुटुंबांना अंत्योदय योजनेतून प्रत्येकी ३५ किलो धान्य मिळत आहे. मात्र प्राधान्य कुटुंबात समाविष्ट झाल्यानंतर या राशनकार्डधारकांना प्रती व्यक्ती पाच किलोनुसार धान्य मिळणार आहे. यामध्ये एका व्यक्तीला तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू मिळणार आहे. १० किलो धान्यामध्ये संपूर्ण महिनाभराचा प्रपंच कसा चालवायचा, असा सवाल या अंत्योदय योजनेतील कार्डधारक करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्याला या फेरबदलाच्या निर्णयातून वगळण्यात यावे, अशी मागणी होत आहे. विद्यमान सरकारच्या काळात अनेक योजनांच्या अंमलबजावणी फेरबदल करण्यात येत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक